शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही पाण्याचा जलस्रोत महामार्ग कामामुळे दूषित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

खेड : पुलासाठी लागणारे गर्डर तयार करण्याकरिता महामार्गाच्या ठेकेदाराने जगबुडी नदीपात्राचाच वापर केला आहे. या कामात लागणाऱ्या सिमेंटमुळे पिण्याच्या ...

खेड : पुलासाठी लागणारे गर्डर तयार करण्याकरिता महामार्गाच्या ठेकेदाराने जगबुडी नदीपात्राचाच वापर केला आहे. या कामात लागणाऱ्या सिमेंटमुळे पिण्याच्या पाण्याचा बारमाही जलस्रोत खराब होण्याची भीती आहे.

कोणत्याही व्यावसायिक कामासाठी नदी पात्रातील जागा वापरता येत नसतानाही पुलाचा ठेकेदार मात्र थेट नदीपात्रातच गर्डर तयार करीत आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील भरणे येथील पूल गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने चर्चेचा विषय बनला आहे. या नदीवरील ब्रिटिशकालीन पूल व नव्याने बांधण्यात आलेला पूल हे दोन्ही पूल वादग्रस्त झाले आहेत. २०१३ साली ब्रिटिशकालीन पुलावरून महाकाली ट्रॅव्हलची आरामबस नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या पुलाच्या जागी नवीन सुरक्षित पूल उभारण्याची मागणी सुरू झाली. चार वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर जगबुडी नदीवर नवीन पुलाला चालना मिळाली.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण मंजूर झाले व जगबुडी नदीवर नवीन पुलाचे सुरू असलेले बांधकाम रखडले. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने पावसाळ्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जुन्या ठेकेदाराकडून हे काम काढून घेतले आणि महामार्ग चौपदरीकरण कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडे वर्ग केले. राजकीय दबाव व जनरेट्यात जगबुडी नदीवरील नवीन पूल सन २०१९ मध्ये वाहतुकीस खुला झाला. लॉकडाऊनमुळे महामार्ग चौपदरीकरण व दुसऱ्या पुलाचे बांधकाम रखडले होते. आता संबंधित ठेकेदाराने जगबुडी नदीवरील चौपदरीकरण कामातील दुसऱ्या पुलाच्या बांधकामाला गती दिली आहे. मात्र, हे काम करताना या ठेकेदाराने पुलाचे गर्डर थेट नदीपात्रातच तयार करून बसविण्यास सुरुवात केली आहे. याबाबत स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे.

जगबुडी नदीपात्रात भरणे येथून पुढे वेरळ, भोस्ते, अलसुरे, शिव, कोंडिवली, आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या विहिरी आहेत. पुलाचे गर्डर बनविताना सिमेंट, काँक्रीट व रसायनांचा वापर केला जात असल्याने पात्रातील जलस्रोत दूषित होण्याची भीती आहे. नदीपात्रातील काही वनस्पतीही यात नष्ट झाल्या आहेत. या प्रकाराची जिल्हाधिकारी व संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.