शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कडक लॉकडाऊनमध्ये राजापुरात कोरोना संसर्गाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात झोलेला कोरोनाचा उद्रेक निश्चितच राजापूरकरांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. कोरोनाच्या ...

राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात झोलेला कोरोनाचा उद्रेक निश्चितच राजापूरकरांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्गाचा आलेख चढताच राहिला आहे़ जनतेची बेफिकीरी आणि शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांनी कोरोना तपासणीबाबत केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह राजापूर शहर आणि ग्रामीण भागातील काही खासगी डॉक्टरांचा आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांवर तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे़ ताप, सर्दी-खोकलासदृश लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तत्काळ कोरोना चाचणी करण्यासाठी वा तशी नोंदणी करून शासकीय रुग्णालयात पाठविणे आवश्यक असून, तरच भविष्यात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात सुरक्षित तालुका अशी राजापूर राजापूर तालुक्याची ओळख होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला आहे. सध्या तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा २ हजार ८६९ वर पोहोचला असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ९३१ इतकी आहे. उपचारांती बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ८१९ इतकी आहे तर आजपर्यंत तालुक्यात दुदैवाने ११९ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.

शिमगोत्सवानंतर तालुक्यातील कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिला आहे. त्यानंतर लग्नसमारंभ, दिवसकार्य व अन्य कार्यक्रमांत होणाऱ्या गर्दीवर ग्रामीण भागात कोणतेच नियंत्रण न राहिल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने झाला आहे. पेंडखळे, कळसवली, ओझर, भू, मंदरूळ, करक, नाणार, प्रिदावण, कुंभवडे यांसारखे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे ग्रामकृती दलांनी अतिदक्षतेने काम करणे गरजेचे आहे.

शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याकडे आलेल्या सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांबाबत तत्काळ ग्रामीण रुणालयात रिपोर्ट करणे आवश्यक असताना व तसा आदेश असतानाही काही खासगी डॉक्टरांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. आजही अनेक खासगी डॉक्टर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती देत नसल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी सांगितले.

-----------------------

सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवा

राजापूर तालुक्यात वाढता कोरोना संसर्गाचे कारण हे लग्नसमारंभ व विनाकारण होणारी गर्दी हेच असल्याचे सध्यातरी पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने लग्न, दिवसकार्य, वाढदिवसासारखे सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना येणारे नातेवाईक, पै-पाहुणे यामुळे होणारी गर्दी यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता आहे़