शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कडक लॉकडाऊनमध्ये राजापुरात कोरोना संसर्गाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात झोलेला कोरोनाचा उद्रेक निश्चितच राजापूरकरांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. कोरोनाच्या ...

राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात झोलेला कोरोनाचा उद्रेक निश्चितच राजापूरकरांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्गाचा आलेख चढताच राहिला आहे़ जनतेची बेफिकीरी आणि शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांनी कोरोना तपासणीबाबत केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह राजापूर शहर आणि ग्रामीण भागातील काही खासगी डॉक्टरांचा आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांवर तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे़ ताप, सर्दी-खोकलासदृश लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तत्काळ कोरोना चाचणी करण्यासाठी वा तशी नोंदणी करून शासकीय रुग्णालयात पाठविणे आवश्यक असून, तरच भविष्यात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात सुरक्षित तालुका अशी राजापूर राजापूर तालुक्याची ओळख होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला आहे. सध्या तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा २ हजार ८६९ वर पोहोचला असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ९३१ इतकी आहे. उपचारांती बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ८१९ इतकी आहे तर आजपर्यंत तालुक्यात दुदैवाने ११९ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.

शिमगोत्सवानंतर तालुक्यातील कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिला आहे. त्यानंतर लग्नसमारंभ, दिवसकार्य व अन्य कार्यक्रमांत होणाऱ्या गर्दीवर ग्रामीण भागात कोणतेच नियंत्रण न राहिल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने झाला आहे. पेंडखळे, कळसवली, ओझर, भू, मंदरूळ, करक, नाणार, प्रिदावण, कुंभवडे यांसारखे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे ग्रामकृती दलांनी अतिदक्षतेने काम करणे गरजेचे आहे.

शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याकडे आलेल्या सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांबाबत तत्काळ ग्रामीण रुणालयात रिपोर्ट करणे आवश्यक असताना व तसा आदेश असतानाही काही खासगी डॉक्टरांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. आजही अनेक खासगी डॉक्टर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती देत नसल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी सांगितले.

-----------------------

सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवा

राजापूर तालुक्यात वाढता कोरोना संसर्गाचे कारण हे लग्नसमारंभ व विनाकारण होणारी गर्दी हेच असल्याचे सध्यातरी पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने लग्न, दिवसकार्य, वाढदिवसासारखे सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना येणारे नातेवाईक, पै-पाहुणे यामुळे होणारी गर्दी यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता आहे़