शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत वादावादी, लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

रत्नागिरी : राष्ट्रवादीच्या रत्नागिरी शहराध्यक्ष नियुक्तीवरून वाद सुरू झाला असून, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ...

रत्नागिरी : राष्ट्रवादीच्या रत्नागिरी शहराध्यक्ष नियुक्तीवरून वाद सुरू झाला असून, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी दोन मतदारसंघांत राष्ट्रवादीचे आमदार झाले. २०१९ साली उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे रत्नागिरीतील राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यानंतर ती वाढलेली नाही. जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी २०१९ मध्ये शहराध्यक्ष पदी तरुण कार्यकर्ते नीलेश भोसले यांची नियुक्ती केली. दोन वर्षे शहराध्यक्ष म्हणून पक्षाच्या उपक्रमात ते सहभागी होत आहेत. मात्र, त्यांच्या आधीचे शहराध्यक्ष अभिजित तथा मनू गुरव यांनी अजूनही आपणच शहराध्यक्ष असल्याचे सांगितले. तेथून हा वाद सुरू झाला आहे.

सोमवारी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब समोर आणली. नगर परिषद निवडणुकीसाठीच्या समितीत मिलिंद कीर यांचे नाव निश्चित झालेले असतानाही वगळण्यात आले. पक्षात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी चर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याशी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर परिषद निवडणुका लक्षात घेऊन मिलिंद कीर यांच्याकडे काही जबाबदारी सोपवण्याचा विचार पक्षाकडून केला जात आहे. मात्र, काही मंडळी त्यात मोडता घालत आहेत. हा मुद्दाम फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

त्यांनी केलेल्या या आरोपांना ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी जोरदार उत्तर दिले आहे. पक्षात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करा, असे कुमार शेट्ये यांनी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. याआधी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे यांना ज्यावेळी काँग्रेसमध्ये विधानसभेची उमेदवारी दिली गेली, त्यावेळी कुमार शेट्ये यांनीच बंडखोरी केली होती. उमेश शेट्ये यांच्या नगराध्यक्ष निवडणुकीतही त्यांनीच पक्षाविरुद्ध काम केले आहे, असेही राजाभाऊ लिमये यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनाच पक्षातून काढून टाका, अशी मागणी राजाभाऊ लिमये, प्रदेश सदस्य बशीर मुर्तुझा, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे. मर्जीतील लोकांना पदे मिळवून देण्यासाठी कुमार शेेट्येच पक्षात फूट पाडत असल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी प्रदेश कार्यालयाकडे केली जाणार आहे.

.................

लवकरच बैठक

रत्नागिरीत निर्माण झालेल्या या वादाबाबत लवकरच बैठक घेण्याची भूमिका जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी घेतली असल्याचे समजते. येत्या चार दिवसांत रत्नागिरीत बैठक घेऊन या दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र बोलावून हा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.

...................

नेते भांडणात मश्गुल

मुळात पक्षाची ताकद घटलेली असताना आणि महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतलेले नसताना पक्ष वाढवण्यावर भर देण्यापेक्षा नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. त्यामुळे उरलेसुरले कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.