शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन काळातही आंबा वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने कडक निर्बंधातही आंबा वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यातही वाशी बाजारात आंब्याच्या खरेदीविक्रीच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने त्यालाही सुसूत्रता आली आहे. त्याच वेळी बागायतदारांनी आंब्याच्या थेट विक्रीवर भर दिला असून, ती वाहतूकही सुरळीत आहे.

हापूसच्या विक्रीसाठी बहुतांश शेतकरी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून आहेत. गतवर्षी लाॅकडाऊन काळात वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने खरेदी विक्रीचे व्यवसाय ठप्प होते. शेतकऱ्यांना खासगी विक्री करावी लागली. या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीविक्री व्यवस्था करताना गर्दी टाळण्यासाठी दोन सत्रांत विभागणी केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनाही तशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजेपर्यंत वाशी मार्केटमध्ये पोहोचलेल्या वाहनातील आंब्याची विक्री सकाळी नऊ वाजता सुरू होते. सकाळी सातनंतर आलेल्या वाहनातील आंबा पेट्यांची विक्री दुपारनंतर होते. शेतकरीही त्याप्रमाणे नियोजन करून आंबा काढणी, पॅकिंग प्रक्रिया वेळेवर पूर्ण करीत आहेत.

गुढीपाडव्यापासून वाशी मार्केटमधील आवक वाढली आहे. दररोज ३४ ते ३५ हजार पेट्या विक्रीसाठी येत आहेत. आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. १,५०० ते ३,५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

आंबा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने आंबा काढणीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना कडक संचारबंदीतून वगळले आहे. गतवर्षीप्रमाणे शासकीय पासचे निर्बंधही हटविण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यंदा बागायतदारांसमाेर समस्या नाहीत. कोरोनाचे संकट, शिवाय उत्पादन कमी असतानाही आंबा काढणी, विक्री, तसेच वाहतूक व्यवस्थेची समस्या तरी यंदा नाही.