शहरं
Join us  
Trending Stories
1
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
2
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
3
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
4
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
6
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
7
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
8
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
9
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
10
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
11
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
12
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
13
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
14
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
15
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
16
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
17
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
18
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
19
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
20
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिडे स्पेशल नियमित करावी:

By admin | Updated: September 14, 2014 23:55 IST

व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते हिरालाल मेहता यांनी मागणी केली

चिपळूण : गणपती उत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर १० दिवसांसाठी वसई रोड - रत्नागिरी ही हॉलिडे स्पेशल रेल्वे गाडी सुरु करण्यात आली होती. या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून संबंधित रेल्वे प्रशासनाने ही गाडी नियमित करावी, अशी मागणी येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते हिरालाल मेहता यांनी केली आहे.
कोकणात गणेशोत्सवाबरोबरच होळी उत्सवालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सव दरम्यान १० दिवसांसाठी ००११७/००११८ ही १८ डब्यांची हॉलिडे स्पेशल गाडी सुरु करण्यात आली होती. ही गाडी वसई रोड येथून १.४५ वाजता सोडली जात होती. मात्र, या गाडीच्या वेळेत बदल करुन ती रात्री ८ वाजता सोडल्यास सर्वांनाच या गाडीचा प्रवास सुखकर होईल. वेस्टन रेल्वे कोकण रेल्वेशी कायम जोडली जाईल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वसई रोड येथून सुटण्यात आलेली हॉलिडे स्पेशन गाडी नियमित करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर वसईरोड - रत्नागिरी ही हॉलिडे स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली होती. ही रेल्वे व त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता ही रेल्वे कायम करावी, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. (वार्ताहर)