शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान : बाळ माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष निखिल देसाई यांचे बाळ माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गणेश भिंगार्डे, अमाेल ...

रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष निखिल देसाई यांचे बाळ माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गणेश भिंगार्डे, अमाेल डाेंगरे, अमेय वीरकर उपस्थित हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : बेकायदेशीरपणे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. सामान्य व्यापारी भिकेकंगाल होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची ही समस्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडे नक्की मांडू, अशी ग्वाही भाजपचे माजी आमदार तथा रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिली.

रत्नागिरी व्यापारी महासंघाचे नूतन तालुकाध्यक्ष निखिल देसाई, शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे, अमोल डोंगरे, अमेय वीरकर यांनी गुरूवारी माजी आमदार माने यांची मारुती मंदिर येथील तालुका खरेदी - विक्री संघाच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी व्यापारी महासंघातर्फे या लॉकडाऊनमुळे कशा प्रकारे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, याची माहिती देण्यात आली.

वाढत्या कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात दर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु आता सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्येही बेकायदेशीर पद्धतीने, फसवणुकीने लॉकडाऊन लावला आहे. यामुळे रत्नागिरी बाजारपेठेची अर्थव्यवस्था बिघडली आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच महिन्यानंतर बाजारपेठ सुरू झाली होती. पण, पाच महिने दुकानातील कामगार, पार्सल गाड्यांमध्ये अडकलेला माल, तसेच अनेक दुकाने कायमची बंद करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे, असे सांगण्यात आले.

नोव्हेंबरपासून दुकाने सुरळीत सुरू झाली होती. हळूहळू जनजीवन सुरळीत होऊ लागले. पण, आता पुन्हा लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघाईस जाणार आहे. मागील वेळेस काही जणांना नुकसान भरपाई मिळाली होती. ती भरपाई पुन्हा मिळणार का? मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ दिली होती. या वेळीही तशीच मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

३० एप्रिलपर्यंत दर शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याला देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. पण सोमवार ते शुक्रवारच्या लॉकडाऊनला विरोध करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात फडणवीस व आमदार दरेकर यांची भेट घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळावी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करू, अशी ग्वाही बाळ माने यांनी दिली.