शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:19 IST

खेड तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५ हजार ३६२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देखेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी खेड तालुक्यात पंचनामे पूर्ण, ४ हजार ८०० शेतकरी बाधित

खेड : तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५ हजार ३६२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.शेतात भाताच्या लोंब्या तयार झाल्या होत्या; परंतु अवकाळी पावसामुळे हे भातपीक शेतजमिनीत गाडले गेल्याने तयार भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. या अनुषंगाने खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा दिवस तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील शेतीची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत.

तालुक्यात २०१९-२० या हंगामी कालावधीत भातशेतीखाली ९ हजार ९८१ हेक्टर ४० गुंठे क्षेत्र आले होते. यामधील १ हजार ५५६ हेक्टर १९ गुंठे क्षेत्र बाधित झाले आहे. या पंचनाम्यामध्ये काढणी पश्चात ३२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १४४ शेतकरी बाधित झाले आहेत.मात्र, उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, एकूण १ हजार ५२४ हेक्टर १९ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले असून, तब्बल ४ हजार ६५६ शेतकरी बाधित झाले आहेत. दिवाळीच्या कालावधीत वादळी वारा व पाऊस यामुळे कापणीसाठी तयार झालेली पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही थोडेफार मिळेल, या आशेने पिकांची कापणी केली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने कापणी केलेली पिके पाण्यात भिजून तरंगू लागली होती. ते भात आता जनावरांसाठीही निरूपयोगी झाले आहे.ओला दुष्काळभातशेतीसाठी शेतकऱ्यांनी २०१९-२०मध्ये घेतलेले कर्ज माफ करावे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. खेड तालुक्यातील २० शेतकऱ्यांचा ८ हेक्टर ९२ गुंठे क्षेत्राचा पीक विमा उतरवण्यात आला आहे. त्याची अमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा होत आहे.कर्जमाफीसह सरसकट भरपाईची अपेक्षाऑगस्ट महिन्यात संततधार पावसामुळे नदीकाठच्या चिंचघर, शिर्शी, भडगाव, खारी, नांदगाव, सुसेरी क्रमांक.१, सुसेरी क्रमांक २, बहिरवली, चिंचवली, उधळे, बोरघर आदी गावातील भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. शेतात आठ ते दहा दिवस पुराचे पाणी साचून राहिल्याने भाताची रोपे कुजली होती. तेव्हाच्या नुकसानाचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेड