शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

खेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:17 PM

खेड तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५ हजार ३६२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देखेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी खेड तालुक्यात पंचनामे पूर्ण, ४ हजार ८०० शेतकरी बाधित

खेड : तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५ हजार ३६२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.शेतात भाताच्या लोंब्या तयार झाल्या होत्या; परंतु अवकाळी पावसामुळे हे भातपीक शेतजमिनीत गाडले गेल्याने तयार भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. या अनुषंगाने खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा दिवस तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील शेतीची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत.

तालुक्यात २०१९-२० या हंगामी कालावधीत भातशेतीखाली ९ हजार ९८१ हेक्टर ४० गुंठे क्षेत्र आले होते. यामधील १ हजार ५५६ हेक्टर १९ गुंठे क्षेत्र बाधित झाले आहे. या पंचनाम्यामध्ये काढणी पश्चात ३२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १४४ शेतकरी बाधित झाले आहेत.मात्र, उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, एकूण १ हजार ५२४ हेक्टर १९ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले असून, तब्बल ४ हजार ६५६ शेतकरी बाधित झाले आहेत. दिवाळीच्या कालावधीत वादळी वारा व पाऊस यामुळे कापणीसाठी तयार झालेली पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही थोडेफार मिळेल, या आशेने पिकांची कापणी केली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने कापणी केलेली पिके पाण्यात भिजून तरंगू लागली होती. ते भात आता जनावरांसाठीही निरूपयोगी झाले आहे.ओला दुष्काळभातशेतीसाठी शेतकऱ्यांनी २०१९-२०मध्ये घेतलेले कर्ज माफ करावे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. खेड तालुक्यातील २० शेतकऱ्यांचा ८ हेक्टर ९२ गुंठे क्षेत्राचा पीक विमा उतरवण्यात आला आहे. त्याची अमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा होत आहे.कर्जमाफीसह सरसकट भरपाईची अपेक्षाऑगस्ट महिन्यात संततधार पावसामुळे नदीकाठच्या चिंचघर, शिर्शी, भडगाव, खारी, नांदगाव, सुसेरी क्रमांक.१, सुसेरी क्रमांक २, बहिरवली, चिंचवली, उधळे, बोरघर आदी गावातील भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. शेतात आठ ते दहा दिवस पुराचे पाणी साचून राहिल्याने भाताची रोपे कुजली होती. तेव्हाच्या नुकसानाचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेड