शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी योजना त्यांना लाभ कधी

By admin | Updated: September 18, 2014 23:21 IST

शिधापत्रिकाधारक : नवीनचा समावेश हवा

चिपळूण : राज्य शासनाने अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वैद्यकीय खर्चात हातभार लाभला असला तरी शासनाने केवळ मार्च २०१३ पूर्वीच्या शिधापत्रिकाधारकांचा या योजनेच्या लाभार्थींमध्ये समावेश केला आहे. त्यानंतर शिधापत्रिका काढलेली लाखो कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. या योजनेच्या लाभार्थींमध्ये मार्च २०१३ नंतरच्या नवीन शिधापत्रिकांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. राज्य शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व नॅशनल इन्श्युरन्स कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार राज्यभरातील ३५ जिल्ह्यांमध्ये तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आठ, दुसऱ्या टप्प्यात २७ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. परंतु, शासनाने मार्च २०१३ पूर्वीच्या अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांचा समावेश लाभार्थींमध्ये केल्याने त्यानंतर तयार झालेल्या नवीन शिधापत्रिकाधारक या योजनेच्या लाभापासून वंचित राहात आहेत. राज्यातील अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये शासनातर्फे करण्यात आलेल्या करारानुसार ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार व १२१ प्रकारच्या फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येत आहे. या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांवर अचानक पडणारा आजारपणातील खर्चाचा बोजा काही प्रमाणात कमी झाला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ जिल्ह्यांतील ४९ लाख ३ हजार १४० कुटुंब, दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २७ जिल्ह्यांतील एकूण १ कोटी ५८ लाख ९१ हजार १५४ अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील करोडो लोकांच्या वैद्यकीय खर्चाची बचत होणार आहे. योजना अमलात आल्यापासून त्याअंतर्गत दिली जाणारी हेल्थ कार्ड अद्याप लाभार्थींना देण्याची प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेकजण या योजनेच्या लाभापासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे. शासनाकडे प्रत्येक महिन्याला नवीन अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांची भर पडत असून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. आता या योजनेतील लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग बिकट होत आहे. (वार्ताहर)लाभार्थींपर्यंत पोहोचण्यास उशीर शासनाच्या अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आजारात सहाय्य मिळण्याचा उद्देशसमाजातल्या विविध दुर्बल घटकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न.शिधापत्रिकाधारकांना लाभ वैद्यकीय खर्चाची बचत.या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळावा, हा प्रमुख हेतू आहे. खासगी वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा हेतू मनात ठेवून पुढे आलेली ही योजना शिधापत्रिकांच्या समस्यांमुळे कठीण बनली आहे.