शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

HSC Exam Result 2025: सलग चौदाव्या वर्षी कोकणचा राज्यात झेंडा, विभागात सिंधुदुर्ग प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:24 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात ...

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात कोकण बोर्डाने अव्वल क्रमांक मिळविला. दरवर्षीप्रमाणे कोकण बोर्डात सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोकण बोर्डाचा निकाल ९६.७४ टक्के लागला असून, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.६७ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.७४ टक्के लागला आहे.कोकण बोर्डांतर्गत एकूण २४३ महाविद्यालये असून, ६१ परीक्षा केंद्रे आहेत. कोकण बोर्डांतर्गत एकूण २३ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एकूण २२ हजार ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९६.७४ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल अधिकशाखानिहाय निकालामध्ये बोर्डात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.१६ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०६ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ९२.२१ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ९७.१३ टक्के लागला आहे. टेक्निकल सायन्सचा निकाल ९२.१५ टक्के लागला आहे.

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिककोकण बोर्डात एकूण ११ हजार ४१८ मुले उत्तीर्ण झाली असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.५० टक्के आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०३ टक्के आहे. तुलनात्मकदृष्ट्या मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.५३ टक्क्यांनी अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा ९५.६७ टक्के निकालरत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ हजार ६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९५.६७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९९ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे. जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमसिंधुदुर्ग जिल्ह्याने यंदाही सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८,२६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, जिल्ह्यातील ८,१६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९८.७४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.२३ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२७ टक्के आहे. जिल्ह्यातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गHSC Exam Resultबारावी निकालkonkanकोकण