शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

HSC Exam Result 2025: सलग चौदाव्या वर्षी कोकणचा राज्यात झेंडा, विभागात सिंधुदुर्ग प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:24 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात ...

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात कोकण बोर्डाने अव्वल क्रमांक मिळविला. दरवर्षीप्रमाणे कोकण बोर्डात सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोकण बोर्डाचा निकाल ९६.७४ टक्के लागला असून, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.६७ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.७४ टक्के लागला आहे.कोकण बोर्डांतर्गत एकूण २४३ महाविद्यालये असून, ६१ परीक्षा केंद्रे आहेत. कोकण बोर्डांतर्गत एकूण २३ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एकूण २२ हजार ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९६.७४ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल अधिकशाखानिहाय निकालामध्ये बोर्डात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.१६ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०६ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ९२.२१ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ९७.१३ टक्के लागला आहे. टेक्निकल सायन्सचा निकाल ९२.१५ टक्के लागला आहे.

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिककोकण बोर्डात एकूण ११ हजार ४१८ मुले उत्तीर्ण झाली असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.५० टक्के आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०३ टक्के आहे. तुलनात्मकदृष्ट्या मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.५३ टक्क्यांनी अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा ९५.६७ टक्के निकालरत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ हजार ६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९५.६७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९९ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे. जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमसिंधुदुर्ग जिल्ह्याने यंदाही सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८,२६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, जिल्ह्यातील ८,१६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९८.७४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.२३ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२७ टक्के आहे. जिल्ह्यातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गHSC Exam Resultबारावी निकालkonkanकोकण