शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांची चौकशी अद्याप अपूर्णच

By admin | Updated: May 14, 2015 23:57 IST

कृषी विभाग : पाच महिने उलटले तरीही कार्यवाहीचा कागद कोराच

रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी अपूर्ण आहे. चौकशी सुरु होऊन पाच महिने सुरु झाले तरी सिमेंटच्या १८८ बंधाऱ्यांपैकी केवळ ११३ बंधाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित चौकशी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.समुद्राचे पाणी शेतात घुसून जमीन नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी शासनाने बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शासनाच्या पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सिमेंट नाला बांध, वळण बंधारा, सलग समतल चर, अनघड दगडी बांध आदि बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. या बंधाऱ्यांवर सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ४ कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. जिल्ह्यात १८८ बंधाऱ्यांची बांधकामे करण्यात आली होती. त्यामध्ये चिपळूणात ५, गुहागरात ९, संगमेश्वरात २६, राजापुरात ११८ आणि रत्नागिरीतील ३० बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांची कामे स्थानिक स्तरावर करण्यात येत होती. मात्र, सिमेंट बंधारे ज्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत, ती कामे निकृष्ठ दर्जाची असल्याची ओरड आजही सुरु आहे. बंधारे बांधल्यानंतर पाणी आत शिरत असल्याने अनेक ठिकाणचे बंधारे निकृष्ठ असल्याचा जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समिती आणि स्थायी समितीमध्ये या विषयांवरुन जोरदार चर्चा झाली होती. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी बैठकांमध्ये सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केली होती. जिल्हा परिषदेच्या सभांमधील होणाऱ्या चौकशीच्या मागणीची दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली होती. त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी अधिकारी पी. एन. देशमुख यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता या चौकशीसाठी तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या होत्या. या समित्यांनी गेल्या पाच महिन्यात ११३ बंधाऱ्यांची चौकशी केली. त्यामध्ये ८३ बंधारे सुस्थितीत, २३ पाणी नसलेले आणि ७ बंधारे लिकेज असल्याचे स्पष्ट झाले आहे. (शहर वार्ताहर)चौकशी पूर्ण होणार ?शासनाच्या कृषी विभागाने केलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष घातले होते. तरीही ही चौकशी करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईल की नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. गेले पाच महिने ही चौकशी सुरु असून, अद्याप ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या चौकशीसाठी आणखी दिवस लागणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.