शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या जागेसाठी वाढीव दर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : विमाने उतरण्यासाठी रत्नागिरीतील विमानतळ पुरेसे आहे. मात्र विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. ही जागा ताब्यात येईपर्यंत काही ...

रत्नागिरी : विमाने उतरण्यासाठी रत्नागिरीतील विमानतळ पुरेसे आहे. मात्र विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. ही जागा ताब्यात येईपर्यंत काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. अजून ५० एकर जागेची त्यासाठी गरज असून, खास बाब म्हणून त्याला अधिक दर मिळावा, असा प्रस्ताव संबंधितांकडे पाठवण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री सामंत यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे विमानतळाच्या कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सर्व प्रांताधिकारी, तटरक्षक दलाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आणि ग्रामस्थही उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी ही माहिती दिली.

विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्णत्त्वाला गेले आहे. येथे विमान उतरू शकते. मात्र विमानाच्या पार्किंगसाठी अधिक जागेची गरज आहे. सध्या पाच हजार रुपये गुंठा इतका दर दिला जात आहे. तो खूपच कमी आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी दीपक कपूर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. खास बाब म्हणून जागेचा अधिक मोबदला देण्याचा प्रस्ताव आपण पाठवत आहोत. त्याला नक्की मंजुरी मिळेल. अर्थात ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत विमानतळाचे काम अडू नये, यासाठी काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.

यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आपल्याकडून सुरू असून, लवकरच विमान वाहतूक सुरू व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.