शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

अवजारांचे सव्वा कोटी अनुदान रखडले

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

कृषी विभाग : संकेतस्थळही खुले होत नसल्याने पेच

रत्नागिरी : शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र, गतवर्षी (२०१३-१४) चे अनुदान कृषी विभागाकडे शासनाकडून प्राप्त झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.फळबागांमध्ये पावसात वाढलेले गवत सफाईचे काम सुरू आहे. थंडी सुरू झाल्यानंतर फवारणी करण्यात येते. मात्र, फवारणीपूर्वी बागांची सफाई करणे आवश्यक आहे. गतवर्षी ४२२ शेतकऱ्यांनी ग्रास कटरची मागणी केली होती. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के, तर राखीव प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर अवजारे पुरविण्यात येतात. ग्रासकटरसाठीचे ५४ लाख २५ हजाराचा निधी कृषी विभागाकडे प्राप्त झालेले नाही.लागवडीपूर्वी शेतीची नांगरणी करण्यासाठी नांगराचा वापर करण्यात येत होता. मात्र, नांगराने नांगरणीसाठी वेळ अधिक जातो, शिवाय मशागत तितकीशी चांगली होत नसल्यामुळे पॉवरटिलर व रोटरी टिलरचा वापर करण्यात येऊ लागला. गतवर्षीच १०० शेतकऱ्यांनी पॉवर टिलर व रोटरी टिलरची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्यांचे ६० लाख रूपये अनुदानाचे थकले आहेत. शेतकऱ्यांनी प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर कृषी विभागाकडून त्यास पूर्वसंमत्ती देण्यात येते. त्यानुसार शेतकरी स्वत: यांत्रिक अवजारे खरेदी करतात. शासनाकडून मंजूर निधी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. मात्र, गतवर्षीचे शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभाग संगणकीकृत केल्याने यावर्षीपासून प्रत्येक योजनेसाठीचे प्रस्ताव आॅनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ल्लँे.ल्ल्रू.्रल्ल संकेतस्थळ खुले होत नाही. शिवाय शेतकऱ्यांना आॅनलाईन प्रणालीबाबत कळत नाही. त्यामुळे या योजनेचा तर यावर्षी बोजवाराच उडाला आहे. (प्रतिनिधी)