शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा तळवडे गावाला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

पाचल : मुसळधार पावसाचा जोरदार फटका राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

पाचल : मुसळधार पावसाचा जोरदार फटका राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांना या नुकसानाची महिती दिली. त्यानंतर तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास आधिकारी सागर पाटील, मंडल अधिकारी गजानन राईन, तलाठी विकास भंडारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली व आपद्ग्रस्तांना धीर दिला.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीला प्रचंड पूर आला होता. या पुराचे पाणी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजावाडीतील अरुण प्रभुदेसाई यांच्या घरात व गोठ्यात शिरले. पाण्याचा प्रचंड प्रवाह घरात शिरत असल्याने त्यांनी आपले कुटंब ग्रामपंचायत सभागृहामध्ये स्थलांतरित केले. गोठ्यातील म्हशी बाहेर काढत असताना त्यातील एक म्हैस दाव्यासहित नदीच्या दिशेने पळाली व पुरात वाहून गेली. या म्हशीची आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ५० हजार रूपये किंमत आहे. या म्हशीबरोबरच त्यांनी वर्षाची बेगमी करून ठेवलेल्या दोन गवताच्या गंजी (वैरण) वाहून गेल्या. अरूण प्रभुदेसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

इंजनवाडीतील शेतकरी संतोष मसूरकर यांची नदीकाठी असलेली पाच एकरवरची भातशेती वाहून जाऊन त्या जागेवर गाळ व दगडांचा खच पडला आहे. शासनाने त्यांच्या शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याच्या लाेंढ्यामुळे ब्राह्मणदेव येथील शेतकरी बाबाजी गोरे व गणेश अनंत कोलते यांच्या घरातील साहित्य वाहून गेले. मोरेवाडीतील राधिका राजाराम चव्हाण यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. राववाडी येथे सुरेश गुडेकर यांच्या जुन्या घरामागील दरड (घळण) ओढ्यात कोसळल्याने येथील पाच एकर मातीत गाडली गेली आहे. बाजारवाडीतील दिलीप साळवी यांचे नदीकाठचे भातशेत वाहून गेले आहे. एकंदरीत या मुसळधार पावसाने मोठा दणका तळवडे गावाला दिला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, आप्पा साळवी, शैलेश साळवी, संजय कदम यांनी केली आहे.