शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ढीगभर अभियाने, प्रवासीसंख्या मात्र होतेय ऊणे

By admin | Updated: July 31, 2014 23:22 IST

गळक्या गाड्या, फुटक्या काचा... : समस्या घेऊन एस. टी. ‘प्रवासी वाढवा’ची सत्वपरीक्षा

उमेश पाटणकर - रत्नागिरी ,, जेमतेम वीस प्रवासी घेऊन चढावात लिलया मागे टाकून एखादा ट्रकचालकही सहज निघून जातो. खिडक्यांमधून पावसाचे पाणी आत येतेय म्हणून सरकून मध्ये बसावे तर डोक्यावर हमखास पाणी गळतेय, अशी परिस्थिती असणारी वाहने दिमतीला घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग प्रवासी वाढवा अभियान सुरु करीत आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, वाहनांच्या सुट्या पार्टची कमतरता, दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि वारंवार कोलमडणारे वेळापत्रक यामध्ये हे अभियान वरिष्ठ अधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा घेणार आहे.दरवर्षी दि. १ आॅगस्टला एस. टी.चे प्रवासी वाढवा अभियान सुरु होते. याची तयारी किमान पंधरा दिवस आधी होते. राज्य मार्ग परिवहनचा रत्नागिरी विभाग प्रतिवर्षी जय्यत तयारीनिशी यात सहभागी होतो. मात्र, यंदाचे अभियान एस. टी.चे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी या सर्वांची सत्वपरीक्षा घेणारे ठरणार आहे. गाड्यांच्या दुरुस्तीचे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचा एस. टी. कर्मचाऱ्यांचा दावा आहे. त्याचा फटका चालक. वाहकांना बसत आहे. अगदी काचेचाच प्रश्न घ्यावा म्हटला तरी रत्नागिरी आगारात किमान चार ते पाच गाड्या अशा आहेत की, ज्यांच्या विन्डोग्लास विविध कारणांनी फुटलेल्या आहेत. पावसात अशा फुटक्या काचांच्या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी नेण्याची वेळ चालकांवर आली आहे. परिवर्तन प्रकारातील बसेस बसेसना भली मोठी अखड विन्डग्लास वापरली गेली आहे. यातील एका बसची काच वरपासून खालपर्यंत अखंड फुटली आहे. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून प्लास्टिक टेप लावून चिकटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रवासादरम्यान बसणाऱ्या हादऱ्यांमुळे फुटलेली ही काच रबरामधून सरकली असून, केव्हाही निसटण्याची शक्यता आहे., अशी या बसची अवस्था असल्याचे दिसून येते.अतिवेगाने अपघात होतात म्हणून एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी सर्वच गाड्या स्पीडलॉक केल्या आहेत. यासाठी अ‍ॅक्सिलेटर पायडलखाली जाडे नटबोल्ट चक्क वेल्डिंग करुन कायमस्वरुपी बसवले आहेत. यामुळे बसेसना पुरेशी गती मिळेनाशी झाली आहे. गाडी रिकामी असली तरी लहान सहान चढावात स्पेशल गिअरचा वापर करावा लागतो.गाड्यांच्या दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने वर्कशॉपमधून आलेली गाडी अनेकदा पहिल्याच पावसात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांचाही खोळंबा होत असल्याचे दृश्य जागोजागी दिसत आहे. त्यामुळे कर्मचारीही हतबल झाले आहेत.