शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याचे नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस ...

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस संपूच नये वाटते. खेळ्यांचे मेळ भरपूर येतात; पण नमन दाखवणारे मोजकेच. ‘अरे, आज नमान हाय’ हे वाक्यच संध्याकाळची वाट पाहायला लावते. लहानपणी तर आम्ही चार पाच किलोमीटरवर नमन पाहायला जायचो; पण एखाद्या खेळ्यांचे पूर्ण नमन पाहायचे असेल तर गुढीपाडव्याला त्यांच्या मांडावर (खेळ बसण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण ) जायचे. खरं तर रावणाला पराभूत करून लंका जिंकणाऱ्या रामाच्या स्वागतासाठी गुढ्या उभारण्याची ही परंपरा. तळकोकणात याच दिवशी खेळ उतरला जातो. आमच्या हर्चे गावात पूर्वी बाहेरगावाहून खेळे आले की, त्यांचे बोचके (तीन दिवसाचे साहित्य) बाहेर मंडपाला लावलेले असे. ते झोपायलाही घरी नाहीत, उलट मांडावर जायचे. त्यातून

कोणी घरी येऊन झोपले तर रात्री अकरा-बाराच्या सुमारास ‘आयना की बायना.. घेतल्याशिवाय जायना’ म्हणत दारात येणारी टोळी खेळगड्याला सोबत घेऊनच रवाना होई. त्यामुळे घरी झोपायचे धाडसच कोणी करेना. हा खेळ गुढीपाडवा झाला की समाप्त होई. आजही आमच्याकडे गुढीपाडव्यादिवशी सकाळीच गावकरांच्या घरी असलेली सोंगे मांडावर आणतात. त्यात राम-लक्ष्मण, वाघ, हरिण यांचे मुखवटे, रावणाची वजनदार फळी, बंडबाहुली,

नटवे आदी साहित्य आणले जाते. इतर दिवशी बरेच खेळे गण, गवळण, वगनाट्य दाखवून नमन संपवतात; पण गुढीपाडव्याला सर्व जुन्या चालीरीती पाहायला मिळतात. आमच्याकडे यादिवशी बरेचदा रात्री बारानंतरच नमन चालू होते ते पहाटेपर्यंत चालते. गण, गवळण, वगनाट्य, याबरोबरच फार्स, अंगोडी सोंगे, हरिण, वाघ, नटवे, बंडबाहुली आणि शेवटी राम-रावण युद्ध. शेवटी सर्व

नमनकरी ‘हिंद भू आमची सेना शिवाजी, राणा मराठ्यांचा बाणा....’ गीत गात गावातील देवतांचा जयजयकार करतात. यानंतर नमनाची सांगता होते. मात्र पाडव्याच्या

दिवशी हरिण म्हणून गेल्यानंतर मागून इतरांनी टाळ्यांनी झोडपलेले, वाघाच्या अंगाखांद्यावर उड्या मारलेले, राम-लक्ष्मण यांना तलवारी घेत खेळवत आणलेले, रावणाला प्रेक्षकांतून आणताना उडालेला हाहाकार, रावणाची जड फळी नाचवून अंगावर आलेला रावण, नारळ फिरवून उतरण्यासाठीची धडपड, राम-लक्ष्मण आपणच नाचवायचे म्हणून आमच्या बंधूंनी लपवून ठेवलेले मुखवटे, काळोखात लाल रंग समजून रावणाला फासलेले तिखट, नमनाला फार उशीर झाल्याने ऐन इंट्रीच्या वेळी झोपलेला सेंदूरदैत्य, गायरीत (शेणकाई) पडलेली पुतनामावशी, वाघ नाचवणारे

बुवा, बंडबावली स्पेशालिस्ट नाऱ्या नाना, कितीही टाइट असले तरी लयीत टाळ वाजवणारे निवळकर (टोपणनावाने महाराज म्हूणन ते अधिक प्रसिद्ध होते.) ही सारी मंडळी, हास्याचे क्षण पाडव्याच्या नमनाला आवर्जून स्मरतात. नमनाच्या अखेरीस चुडी (एकत्र बांधलेल्या गवताच छोट्या पेंढ्या) पेटवून खेळ खेळला जातो आणि शिमगोत्सवाची सांगता होते. बऱ्याचदा पहाटे नमन आवरून शेजारी भडे गावात जायची आमची इच्छा असे. पाडव्याला तिकडे नमनाची सांगता रसान्यात उड्या मारून होते. आजही तेथे

साधारण २० बाय २० फुटांच्या चौरसात किमान अडीच फूट रसाना (लाकडे जाळून निखाऱ्याचा ढीग) केला जातो. नमनाच्या शेवटी गावकरी आणि मानकरी तसेच समस्त खेळगडी ‘लागेलो, लागेलो’ च्या जयघोषात बिनधास्तपणे

रसान्यात उड्या घेत शिमगोत्सवाची सांगता करतात. दोन्ही गावांतील पाडव्याचे नमन पाहता शिवाजी महाराजांचे वंशज अनेक पिढ्यांपासून धगधगत्या आगीशी खेळ करून निडरपणे जगण्यास समर्थ असल्याचेच द्योतक वाटतात.

पूर्वापार चालत आलेल्या या रूढी-परंपरांना नव्या पिढीचा बाज मिळाला, हे जरी खरे असले तरीही पाडव्याच्या नमनात पारंपरिकतेची रेलचेल आजही पाहावयास मिळते जी चिरस्मरणीय ठरते.

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा