शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने निम्मीच रक्कम भरल्याने २४ हजार शेतकऱ्यांचा परतावा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अद्याप हिश्शाची निम्मीच रक्कम भरण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अद्याप हिश्शाची निम्मीच रक्कम भरण्यात आली आहे. उर्वरित रक्कम प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील २४ हजार ६५९ शेतकऱ्यांचा विमा परतावा रखडला आहे. शासनाने पूर्ण रक्कम भरल्याशिवाय शेतकऱ्यांना परतावा मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परताव्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

उच्चत्तम तापमान, अवेळीचा पाऊस आणि नीच्चांकी तापमान याचा परिणाम आंबा, काजू उत्पादनावर झाला आहे. त्यातच तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा जमिनीवर आला. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. त्यामध्ये अवेळी पावसासाठी दि. १ डिसेंबर ते १५ मे, कमी तापमानासाठी दि.१ जानेवारी दि. १५ मार्च, जास्त तापमानासाठी दि. १ मार्च ते दि. १५ मे आणि गारपीटसाठी दि. १ फेब्रुवारी ते दि. ३१ मे हा कालावधी जाहीर करण्यात आला. आंबा पिकासाठी विमा कालावधी डिसेंबर ते दि. १५ मेपर्यंत होता.

विमा निकषांमध्ये काजूसाठी अवेळी पावसाचा कालावधी दि. १ डिसेंबर ते दि. ३१ मार्च ग्राह्य धरला होता. या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ३,२९३ बागायतदारांनी काजू क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. विमा कालावधी संपून तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही विमा परताव्याची रक्कम बागायतदारांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

जिल्ह्यातील २१,३६६ आंबा, तर ३,२९३ काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला आहे. १४,९३७ हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी प्रीमियमसाठी ९ कोटी ९४ लाख ६९ हजार ९६३ रूपयांची रक्कम भरली आहे. मात्र, राज्य शासनाकडून ४५ कोटी ९ लाख २७ हजार ३८१ तर केंद्र शासनाकडून २४ कोटी ३४ लाख २९ हजार २३९ रूपयांचा हप्ता असताना, हप्त्याची निम्मीच रक्कम प्राप्त झाली असली तरी निम्मी रक्कम प्राप्त होणे गरजेचे असल्याने परतावा प्राप्त होण्यास विलंब होत आहे.

---------------------------

२०१९पर्यंत फळपीक विमा योजनेसाठी हेक्टरची मर्यादा नव्हती. मात्र, २०२०पासून चार हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा योजनेसाठी निकष जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४६ असल्याने विमा कंपनीने संबंधित शेतकऱ्यांकडून ‘ना हरकत दाखला’ मागवला होता. मात्र, ४४ शेतकऱ्यांनी दाखला दिला असला तरी दोन शेतकऱ्यांनी मात्र तो देण्यास नकार दर्शविला आहे.

-----------------------------

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसांत शेतकऱ्यांना विमा परताव्याची रक्कम प्राप्त होणे गरजेचे होते. मात्र, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही परतावा जाहीर केलेला नाही. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असताना तसेच नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून संपूर्ण रक्कम भरली गेली असताना शासनाकडून मात्र हप्त्याची रक्कम भरण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकरी परताव्यापासून वंचित राहिले आहेत.

- राजन कदम, आंबा बागायतदार

---------------------------

शेतकरी २४,६५९

विमा संरक्षित क्षेत्र १४,९३७ हेक्टर

विमा संरक्षित रक्कम १९८ कोटी ९३ लाख ९९ हजार २७३ रुपये

एकूण प्रीमियम ७९ कोटी ३८ लाख २६ हजार ५८४ रुपये

शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम ९ कोटी ९४ लाख ९९ हजार ६३ रुपये

राज्य शासनाचा हप्ता ४५ कोटी ९ लाख २७ हजार ३८१ रुपये

केंद्र शासनाचा हप्ता २४ कोटी ३४ लाख २९ हजार २३९ रुपये