शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची गांधीगिरी

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

सामान्य जनतेच्या मनात फसवणुकीची भावना निर्माण झाली असल्याचे

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीवेळी अनेक आश्वासने देणाऱ्या मोदी सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला तरी अद्याप एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना आज मंगळवारी निवेदन देण्यात आले.२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. यात पेट्रोल-डिझेल स्वस्त करणार, महागाई रोखणार, नोकऱ्या देणार, काळा पैसा परत आणणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, औषधे स्वस्त करणार, दहशतवादाविरूद्ध कठोर कारवाई करणार, चीनला वठणीवर आणणार, अशा अनेक आश्वासनांचा समावेश होता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता पदग्रहण करून एक वर्ष पूर्ण झाले तरी यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. किंबहुना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावलेही टाकण्यात आलेली नाहीत. यामुळे सामान्य जनतेच्या मनात फसवणुकीची भावना निर्माण झाली असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मोदी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यामुळे आतातरी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यात रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष नाना मयेकर, जिल्हा मीडियाप्रमुख हारीस शेकासन, सुहेल मुकादम, जिल्हा सचिव प्रसाद उपळेकर, दीपक राऊत यांचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भावना निवेदनाद्वारे शासनाकडे पोहोचवण्याची ग्वाही दिली.या निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश कीर, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, नाथा आढाव, काका तोडणकर, नंदू साळवी, वि. सु. सावंत, पद्माकर पवार, अरूण नेवरेकर, रोहित मयेकर, विनोद गोरे, राजन मोरे, नंदकुमार मोरे, अशोक वाडेकर, शब्बीर खान, साहील भाटकर, विवेक भाटकर, मुकद्दर जमादार, इम्तियाज पटेल, बुरहान वस्ता, आतिफ साखरकर यांच्या स्वाक्षरी आहेत. (प्रतिनिधी)