शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांच्या तपासणीसाठी राजापुरात चार तपासणी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

राजापूर : कोविडची तिसरी लाट तालुक्यात पसरू नये म्हणून व तालुक्यातील नागरिकांचा गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या ...

राजापूर : कोविडची तिसरी लाट तालुक्यात पसरू नये म्हणून व तालुक्यातील नागरिकांचा गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच त्यांची ७२ तासांतील कोविड चाचणी झाली का, याची तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता सागवे, रेल्वेस्थानक, अणुस्कुरा तपासणी नाका व राजापूर आगार येथे तपासणी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली.

राजापूर पंचायत समितीची सभा नूतन सभापती करूणा कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपसभापती अमिता सुतार, गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य व सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत तालुक्यातील एस. टी. फेऱ्या सुरू करण्यावरून खडाजंगी झाली. अखेर गणेशात्सवानंतर या संदर्भात बैठक घेण्याचे ठरवून या विषयावर पडदा टाकण्यात आला. शासन परिपत्रकानुसार तालुक्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तालुक्यात सद्यस्थितीत १० शाळा सुरू आहेत. मात्र, अन्य शाळा सुरू करताना गणेशोत्सवानंतर तालुक्यातील कोविडचा आढावा घेत शाळा सुरू करण्याचा सूचना देण्यात आल्या. तसेच तालुक्यात अडीच हेक्टर जागा उपलब्ध झाल्यास अविष्कार केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी अभिजीत तेली यांनी शासकीय जागांचा शोध घेत अविष्कार केंद्रासाठी जागा उपलब्ध करावी, अशी सूचना मांडली.

कोविडच्या कालावधीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी न करता त्यांना पुढे कायम ठेवण्यात यावे तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोविड सेंटर व रुग्णालये बंद न करता कार्यान्वित ठेवा, असे आदेश यावेळी देण्यात आले. तसेच तालुक्यातील खारलॅण्डच्या बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

---------------------

मुदतीआधीच वीज खंडित

विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी सर्वसामान्यांसाठी काम करत नसून स्वार्थापोटी काम करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. विद्युत बिल भरण्याची अंतिम मुदत दि. २ सप्टेंबर असताना संबंधित ग्राहकाने बिल भरले नाही म्हणून अंतिम तारखेच्या आधीच विद्युत पुरवठा खंडित केल्याची घटना ओणी येथे घडल्याचे सदस्य प्रतीक मठकर यांनी सांगितले.

------------------

विद्युत पुरवठा खंडित करु नये

तालुक्यातील आपला वसुलीचा रेशो खाली येऊ नये म्हणून अधिकारी ग्राहकांकडून सक्तीची वसुली करत आहेत, असा आरोप करण्यात आला. ज्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करावा व गणेशोत्सव कालावधीमध्ये ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करु नये, असे आदेश देण्यात आले.