शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मुलींचा प्रथमच राज्यात झेंडा

By admin | Updated: October 16, 2015 22:48 IST

राज्यस्तरीय खो - खो स्पर्धा : पंधरा वर्षानंतर रत्नागिरीला उपविजेतेपद

रत्नागिरी : राज्य खो-खो असोसिएशन आणि सातारा जिल्हा अ‍ॅमेच्युअर खो - खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण (जि. सातारा) येथे झालेल्या राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेत रत्नागिरीच्या संघाने प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश केला. ठाण्याबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात त्यांना चार गुणांनी पराभव पत्कारावा लागला. गेल्या पंधरा वर्षात प्रथमच जिल्ह्यातील मुलींनी राज्यात रत्नागिरीचा झेंडा फडकवला आहे.महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याचा संघ राष्ट्रीय खेळाडूंनी भरलेला होता. तर दुसरीकडे रत्नागिरीच्या संघात ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे, अपेक्षा सुतार, श्रध्दा लाड यांचा समावेश होता. अंतिम सामना चुरशीचा झाला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतने २.३० मि., ३.२० मि. आणि आरती कांबळेने १.३० मि., १.५० मि. खेळ करत ठाण्याच्या संघाला जेरीस आणले. श्रध्दा लाडने उत्कृष्ट खांब मारत दोन गडी टिपले. ठाण्याच्या बलाढ्य संघाला अंतिम सामन्यात विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र, ठाण्याच्या अनुभवी संघापुढे रत्नागिरीच्या मुलींना पराभव पत्करावा लागला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतला सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरवण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही बलाढ्य उस्मानाबाद संघाला रत्नागिरीने १ गुण व २ मिनिटे राखून पराभूत केले. रत्नागिरीने नाणेफेक जिंकून संरक्षण घेतले. मध्यंतराला रत्नागिरीकडे ३ गुणांची आघाडी होती. ऐश्वर्या सावंतने २ मि. व २.१० मि. खेळ, आरती कांबळेने २.३० मि., १.४० मि., तन्वी कांबळेने २.३० मि. नाबाद आणि ०.३० मि. आणि दोन गडी बाद केले. तर अपेक्षा सुतारने २ मि., १.१० मि. आणि श्रध्दा लाडने १.३० व ३ गडी बाद केले. त्यांच्या आक्रमक खेळामुळे हा सामना रत्नागिरीने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्य असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी संघाला संदीप तावडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय खेळाडू पंकज चवंडे हे या संघाचे प्रशिक्षक असून, विनोद मयेकर व्यवस्थापक आहेत. या विजयानंतर रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी माजी आमदार बाळ माने, प्रसन्न आंबुलकर, असोसिएशनचे अध्यक्ष नाना मयेकर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, बाळा मयेकर, समीर काबदुले, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)गेली पंचवीस वर्षे विवेक पंडित, कै. दिगंबर नाचणकर आणि मी खो-खोची मुहूर्तमेढ रोवली. त्याला असंख्य लोकांचे हातभार लागले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हा खेळ टिकवून ठेवण्याची धडपड होती. सुरवातीला एकतरी राष्ट्रीय खेळाडू झाला पाहिजे, अशी इच्छा होती. मात्र, गेल्या पंधरा वर्षात असंख्य राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. मात्र, संघ म्हणून जिंकण्याची इच्छा फलटण येथील राज्य स्पर्धेतील अंतिम सामन्यातील भरारीतून पूर्ण झाली. अशीच घौडदौड कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल, अशी प्रतिक्रिया राज्य खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सचिव संदीप तावडे यांनी व्यक्त केली.