शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे पंधरा हजार प्रकरणे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रत्नागिरी : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधि सेवा ...

रत्नागिरी : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये झटपट निर्णय घेण्यासाठी प्राधिकरणाकडे पंधरा हजार प्रकरणे दाखल झाली आहेत.

मागील लोकअदालतीमध्ये एकूण ७४८ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन सुमारे ८ कोटी ३९ लाख एवढ्या रकमेचे वसुली वादांचे निवारण झाले होते. त्यानंतर येत्या २५ रोजी होणाऱ्या लोकअदालतमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांची संख्या दुपटीने वाढली आहे. लोकअदालतीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित प्रकरणे, तसेच न्यायालयात दाखल न झालेली वादप्रकरणे त्वरित निकाली काढून वादाचे निवारण केले जाते. त्यामुळे वादावर करावा लागणारा खर्च, वकील फी, स्टॅम्प ड्यूटी आणि विशेष म्हणजे पक्षकारांचा वेळ आणि पैसा यांची बचत होते. लोकअदालतमध्ये झालेल्या निवाड्याला दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाएवढेच महत्त्व असल्यामुळे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त फायद्याचे म्हणजे त्यावर अपील होत नसल्यामुळे वाद त्या ठिकाणी संपुष्टात येतो.

लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांबरोबरच वादपूर्व प्रकरणांमध्ये म्हणजे विद्युत कंपनी, विविध बँका, पतसंस्था यांचे थकीत बाकी येणेबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत यांचे विविध विभागांच्या थकीत रकमेबाबतची प्रकरणे, पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे, वाहतूक विभाग यांनी वाहनावर केलेली दंडात्मक कारवाई, त्याच्या वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात निवाडा झाल्यास न्यायालयात दावे दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बँका, वाहतूक शाखा, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांनी न्यायालयीन कामकाजासाठीचा खर्च वाचावा, यासाठी लोकअदालतीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक पर्यायी वादनिवारणाचा विचार करीत असल्याचे दिसून येते.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण एम. क्यू. एस. एम. शेख व वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आनंद सामंत यांनी लोकअदालतमध्ये सहभागाचे आवाहन केले असून, सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांसाठी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक चांगली संधी चालून आली आहे. सामंजस्य आणि तडजोडीने वाद मिटविण्यासाठीच लोकन्यायालयाचा मार्ग निवडण्याचे आवाहन विधि सेवा प्राधिकरणाने केले आहे.