शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे पंधरा हजार प्रकरणे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रत्नागिरी : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधि सेवा ...

रत्नागिरी : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये झटपट निर्णय घेण्यासाठी प्राधिकरणाकडे पंधरा हजार प्रकरणे दाखल झाली आहेत.

मागील लोकअदालतीमध्ये एकूण ७४८ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन सुमारे ८ कोटी ३९ लाख एवढ्या रकमेचे वसुली वादांचे निवारण झाले होते. त्यानंतर येत्या २५ रोजी होणाऱ्या लोकअदालतमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांची संख्या दुपटीने वाढली आहे. लोकअदालतीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित प्रकरणे, तसेच न्यायालयात दाखल न झालेली वादप्रकरणे त्वरित निकाली काढून वादाचे निवारण केले जाते. त्यामुळे वादावर करावा लागणारा खर्च, वकील फी, स्टॅम्प ड्यूटी आणि विशेष म्हणजे पक्षकारांचा वेळ आणि पैसा यांची बचत होते. लोकअदालतमध्ये झालेल्या निवाड्याला दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाएवढेच महत्त्व असल्यामुळे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त फायद्याचे म्हणजे त्यावर अपील होत नसल्यामुळे वाद त्या ठिकाणी संपुष्टात येतो.

लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांबरोबरच वादपूर्व प्रकरणांमध्ये म्हणजे विद्युत कंपनी, विविध बँका, पतसंस्था यांचे थकीत बाकी येणेबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत यांचे विविध विभागांच्या थकीत रकमेबाबतची प्रकरणे, पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे, वाहतूक विभाग यांनी वाहनावर केलेली दंडात्मक कारवाई, त्याच्या वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात निवाडा झाल्यास न्यायालयात दावे दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बँका, वाहतूक शाखा, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांनी न्यायालयीन कामकाजासाठीचा खर्च वाचावा, यासाठी लोकअदालतीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक पर्यायी वादनिवारणाचा विचार करीत असल्याचे दिसून येते.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण एम. क्यू. एस. एम. शेख व वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आनंद सामंत यांनी लोकअदालतमध्ये सहभागाचे आवाहन केले असून, सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांसाठी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक चांगली संधी चालून आली आहे. सामंजस्य आणि तडजोडीने वाद मिटविण्यासाठीच लोकन्यायालयाचा मार्ग निवडण्याचे आवाहन विधि सेवा प्राधिकरणाने केले आहे.