शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे पंधरा हजार प्रकरणे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रत्नागिरी : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधि सेवा ...

रत्नागिरी : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये झटपट निर्णय घेण्यासाठी प्राधिकरणाकडे पंधरा हजार प्रकरणे दाखल झाली आहेत.

मागील लोकअदालतीमध्ये एकूण ७४८ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन सुमारे ८ कोटी ३९ लाख एवढ्या रकमेचे वसुली वादांचे निवारण झाले होते. त्यानंतर येत्या २५ रोजी होणाऱ्या लोकअदालतमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांची संख्या दुपटीने वाढली आहे. लोकअदालतीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित प्रकरणे, तसेच न्यायालयात दाखल न झालेली वादप्रकरणे त्वरित निकाली काढून वादाचे निवारण केले जाते. त्यामुळे वादावर करावा लागणारा खर्च, वकील फी, स्टॅम्प ड्यूटी आणि विशेष म्हणजे पक्षकारांचा वेळ आणि पैसा यांची बचत होते. लोकअदालतमध्ये झालेल्या निवाड्याला दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाएवढेच महत्त्व असल्यामुळे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त फायद्याचे म्हणजे त्यावर अपील होत नसल्यामुळे वाद त्या ठिकाणी संपुष्टात येतो.

लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांबरोबरच वादपूर्व प्रकरणांमध्ये म्हणजे विद्युत कंपनी, विविध बँका, पतसंस्था यांचे थकीत बाकी येणेबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत यांचे विविध विभागांच्या थकीत रकमेबाबतची प्रकरणे, पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे, वाहतूक विभाग यांनी वाहनावर केलेली दंडात्मक कारवाई, त्याच्या वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात निवाडा झाल्यास न्यायालयात दावे दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बँका, वाहतूक शाखा, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांनी न्यायालयीन कामकाजासाठीचा खर्च वाचावा, यासाठी लोकअदालतीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक पर्यायी वादनिवारणाचा विचार करीत असल्याचे दिसून येते.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण एम. क्यू. एस. एम. शेख व वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आनंद सामंत यांनी लोकअदालतमध्ये सहभागाचे आवाहन केले असून, सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांसाठी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक चांगली संधी चालून आली आहे. सामंजस्य आणि तडजोडीने वाद मिटविण्यासाठीच लोकन्यायालयाचा मार्ग निवडण्याचे आवाहन विधि सेवा प्राधिकरणाने केले आहे.