शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

महापूर ओसरल्यानंतरही चिपळूणचे जनजीवन ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी चिपळुणात दौरे केले. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या हाती काहीही मदत किंवा सहकार्य लाभलेले नाही. उलट येथील जनजीवन आजही ठप्प असून, पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, कपडे, पाणी, वीज व पेट्रोल टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

महापुरामुळे संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, हजारो गाड्या वाहून गेल्या, तर काही निकामी झाल्या. आता पूर ओसरून तीन दिवस झाले तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात सुसूत्रता आलेली नाही. बाहेरच्या ठिकाणाहून येत असलेली मदत ठराविक ठिकाणी व रस्त्यालगत असलेल्या भागात होत आहे. परंतु, अंतर्गत भागात अजूनही मदत पोहोचलेली नाही. अनेक नागरिक अन्नधान्य व अन्य वस्तूंपासून वंचित आहेत. त्याशिवाय पुरासोबत कपडे, अंथरूण वाहून गेल्याने किमान चटई, ब्लँकेट मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

चिपळूणकरांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांसोबत पाहणी दौरा केला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, आश्वासनांशिवाय अद्याप हाती काहीच पडलेले नाही.

शहरातील काही भागात पाणी पुरवठा होत नाही. अनेकांच्या घरात अजूनही अंधार आहे. पाच दिवसानंतरही बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांवर आलेल्या चिखलातून मार्ग काढताना जीव मेटाकुटीला येत आहे.

-------------------------

मदत नक्की कधी मिळणार?

शहरात नुकसानाचे पंचनामे सुरु झाले आहेत. पण, हे पंचनामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने मदत नक्की कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच काही व्यापाऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत दुकानेही उघडलेली नाहीत.

------------------------------

विमा कंपन्यांच्या नियमावलीने व्यापारी हैराण

बाजारपेठेतील केवळ ३० टक्के व्यापाऱ्यांनी दुकानातील मालाचा विमा उतरवला आहे. त्याव्यतिरिक्त ७० टक्के व्यापाऱ्यांकडे विमाच नाही. अशावेळी ज्यांच्याकडे विमा आहे व ज्यांच्याकडे विमा नाही, असे दोन पद्धतीने पंचनामे केले जात आहेत. परंतु, ज्यांच्याकडे विमा आहे ते व्यापारी विमा कंपन्यांच्या नियमावलीनेच हैराण झाले आहेत.

----------------------------------

चिपळूण बाजारपेठेत यापुढे व्यापार करु नये, अशी मानसिकता तयार झाली आहे. दुकानातील मालाचा विमा उतरवूनही सुरक्षितता नसेल व अशाप्रसंगी व्यापाऱ्यांना मदत मिळत नसेल तर व्यापार, व्यवसाय न केलेलाच बरा. आता तर अन्य ठिकाणी व्यापार करायला जावे, असे वाटू लागले आहे.

- अरुण भोजने, व्यापारी, चिपळूण.