शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

वीजपुरवठा नियमित होण्यासाठी कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 2:25 PM

वीज गेली की, पहिला आधी तोंडात येतो तो अपशब्दच! पावसाळ्याच्या काळात तर जर वीज खंडित झाली की, अनेकांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो.

- अरुण आडिवरेकर रत्नागिरी : वीज गेली की, पहिला आधी तोंडात येतो तो अपशब्दच! पावसाळ्याच्या काळात तर जर वीज खंडित झाली की, अनेकांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. पण ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करत महावितरणचे कर्मचारी वीज सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. गुहागर तालुक्यातील पालशेत गावातील वीज सुरळीत करण्यासाठी चक्क महावितरणचा कर्मचारी तारेवरची कसरत करत होता.

पावसाळ्याचे दिवस असल्याने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण जास्त असते. या काळात तारा तुटून पडणे, झाड तारांवर कोसळणे, वीजखांब कोसळून वीज जाणे यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे अनेकवेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. काहीवेळेला काही तास विजेची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, याही परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू असतात. वीज खंडित होऊन जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत असतात.

गुहागर तालुक्यातील पालशेत भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी त्याठिकाणी पोहाचले. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे नदीच्या पलिकडे जाऊन काम करणे कठीण बनले होते. आजूबाजूला असणाऱ्या झाडांमधील विजेच्या तारा मोकळ्या केल्याशिवाय वीज सुरळीत करणे कठीण होते. त्यातच सोसाट्याचा वारा सुटल्याने काम करणे अवघड होते.

अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्याने रस्सीचा आधार घेत नदीच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तुफान वेगाने जाणारा पाण्याचा लोंढा, सोसाट्याचा वारा आणि त्याही परिस्थितीत रस्सीच्या आधाराने नदीपलिकडे जाऊन काम करण्याची जिद्द होती. आपल्या जीवावर उदार होऊन हा कर्मचारी केवळ त्या भागातील वीज सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत होता. रस्सीच्या आधारावर हा कर्मचारी झाडांमध्ये अडकलेल्या विजेच्या तारा मोकळा करण्यासाठी जीवाशी खेळत होता.