शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कडक लॉकडाऊनमुळे एस.टी. बंद, मात्र खासगी वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व ...

राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व राजापूर नालासोपारा अर्नाळा या बसेस ३ जूनपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये एस.टी. वाहतूक बंद असताना काही खासगी वाहतूकदार मात्र राजरोसपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त हाेत असून, एस.टी. आणि एस.टी़.तून प्रवास करणाऱ्यांमुळेच काेराेनाचा संसर्ग हाेताे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत यापूर्वी व आताही मुंबईतून कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून मुंबईत जाणाऱ्या कोकणी जनतेची गैरसोय होत आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून १५०० ते २००० रुपये तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. खासगी प्रवासी वाहतूकदार लाॅकडाऊनमध्ये दामदुप्पट तिकीट दर आकारून आपली पाेळी भाजून घेत आहेत.

राजापूर आगारातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी राजापूर - बोरिवली व राजापूर - नालासोपारा - अर्नाळा या दोन गाड्या सुरू केल्या होत्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रसंगी प्रवाशांच्या सेवेसाठी तोटा सहन करून एस.टी़.ने ही वाहतूक सुरू केली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ३ जूनपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या एस.टी़. बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्या मंगळवारपासूनच बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात पाचल आणि नाटे भागात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. आता केवळ राजापूर, रत्नागिरी मार्गावरच दिवसभरात सहा बसेस सोडण्यात येत आहेत. लाॅकडाऊनमध्ये एस.टी. सेवा बंद असली तरी, खासगी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.