शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटेकर यांच्या ‘नाम’मुळे काेकणातील अनेक गावे झाली जलसमृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नाम फाऊंडेशनच्या मदतीने कोकणातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत नदी, ओढे, तलाव गाळमुक्त करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नाम फाऊंडेशनच्या मदतीने कोकणातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत नदी, ओढे, तलाव गाळमुक्त करून जलक्रांती करून पाणीटंचाईला रोखले आहे. या गावांनी दिलेल्या ‘जल है, तो कल है’च्या संदेशातून प्रेरणा घेत आता कोकणातील अनेक गावे नामच्या मदतीने जलक्रांतीसाठी पुढे येत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून भविष्यातील पाण्याचे मोठे संकट लक्षात घेऊन ‘जल है, तो कल है’च्या जनजागृतीसाठी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. केवळ जनजागृतीसाठीच नाही, तर प्रत्यक्ष जलक्रांती करण्यासाठी अनेक गावांना उद्युक्त करीत त्यासाठी त्यांना अद्यावत यंत्रसामग्री अनेक महिने मोफत उपलब्ध करून दिली. नाना पाटेकरांच्या नामचे कार्य अल्पावधीतच खेडोपाडी पोहोचले.

कोकणात पाऊस खूप पडतो, तरीही मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. त्यामुळे कोकणात गाळाच्या समस्येबरोबरच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ याबाबत जागृती होणे गरजेचे असल्याने नामचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी कोकणाकडे लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी जिल्ह्यात २०१६ मध्ये नाम फाऊंडेशनने चिपळूण आणि परिसरातील ९ शाळांमध्ये अडीच हजार झाडे लावून आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे या दुर्गम भागात कोकणातील पहिल्या जलसमृद्धीच्या प्रकल्पाचा प्रारंभ झाला. या ग्रामस्थांची एकी वाखाणण्याजोगी होती. प्रत्येक घरातून २०० रुपये वर्गणी काढून, मुंबईस्थित ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मुंबईत पारंपरिक कार्यक्रम करून गोळा झालेल्या निधीतून या गावाने नदीतील गाळ उपसा करून गावातील पाणीटंचाई दूर केली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काेळोशी येथील ग्रामस्थांच्या एकीतून आणि नामच्या माध्यमातून पाझर तलावाचे काम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पच मानायला हवा. नामकडून मशीनरी मोफत पुरविली जाते. फक्त त्यासाठी लागणारा डिझेलचा खर्च त्या गावाला करावा लागतो.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये नामच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाल्यानंतर काही गावांमध्ये स्वत: नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते कामांचा प्रारंभ झाला. कोकणातील या कामांमध्ये या दोघांसोबतच मुख्य समन्वयक गणेश थोरात, जलतज्ज्ञ डाॅ. अजित गोखले, कोकण समन्वयक समीर जानवलकर, अविनाश गोखले, राजीव सावंत तसेच नामचे दापोली प्रतिनिधी योगेश पिंपळे, समीर पाटील, लांजाचे प्रकाश सावंत, पाटोळे, गुहागरचे हेमंत चव्हाण, रत्नागिरीचे राजेंद्र चव्हाण, नीलेश मुळ्ये, चिपळूणचे महेंद्र कासेकर, रमण डांगे, राजापूरचे रघुवीर बापट, संगमेश्वरचे रोहित सावंत, भगवत सिंह चुनदावत, खेडचे सुनील आंबरे, अंकुश विचारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

यावर्षी नामच्या संपर्कात असलेल्या संगमेश्वर, आरवली, हरचेरी, सांगवे, मंडणगड, हेदवी, दाभोळे, सिंधुदुर्गातील नांदोसकट्टा तसेच देवळे येथे अपूर्ण राहिलेले काम नामच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राजकारणविरहीत सुरू असलेल्या नामच्या कार्यामुळे कोकणातील अनेक गावे जलसमृद्ध झाली आहेत, होत आहेत

.............................

नाम फाऊंडेशन गावांमध्ये काम करण्यासाठी सदैव तयार आहे. ग्रामस्थांनी राजकारणविरहीत पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी एकत्र यायला हवे. प्रत्येक ठिकाणी झाडे लावली, तर जमिनीची धूप थांबेल. भविष्यातील पाणीसंकट लक्षात घेऊन आताच काम करायला हवे.

- समीर जानवलकर, कोकण समन्वयक, नाम फाऊंडेशन