शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस अधिकाऱ्यांना ग्रामीण शिक्षण कळते का?

By admin | Updated: October 12, 2015 00:31 IST

अनुदान बंद झाल्यामुळे शैक्षणिक संस्था अडचणीत आल्यात.

गणपतीपुळे : आजच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री शिक्षणावर एवढा खर्च कशाला, असा प्रश्न उपस्थित करतात. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जाचक परिपत्रके काढली जातात. शिक्षणावर होणारा खर्च रोखला, तर राज्याचा विकास होईल का? असे सांगत राज्य सरकारने शिक्षणात ढवळाढवळ करू नये, धोरण ठरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती माहीत आहे का? असा सवाल माजी शिक्षणमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे कुलपती आमदार पतंगराव कदम यांनी उपस्थित केला. मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, अध्यक्ष राजाभाऊ लिमये, बाबाराम कदम, गजानन पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचा आमदार कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. देशात सर्वाधिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण संस्था उभारण्याचे काम येथे सुरु झाले. सरकारपेक्षा खासगी शैक्षणिक संस्था महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देत आहेत. (वार्ताहर)अनुदान बंद झाल्यामुळे शैक्षणिक संस्था अडचणीत आल्यात. कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणारे शिक्षक हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करतात, अशी दयनीय अवस्था शिक्षकांची झाली आहे. यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात शिक्षणावर कमी खर्च होतो. तरीही राज्य सरकारमधील मंत्र्यांना शिक्षणावर होणारा खर्च जास्त वाटतो, हे हास्यास्पद असल्याचे आमदार कदम म्हणाले.