शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अन्य राज्यातील पदवी नाकारली..!

By admin | Updated: March 25, 2015 00:44 IST

नर्स भरती : सुमारे दोनशे उमेदवारांवर अन्याय

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईतर्फे सरळसेवेने स्टाफ नर्स भरती घेण्यात आली. मात्र, या भरतीवेळी अन्य राज्यात नर्सिंग कोर्स केलेल्या मराठी उमेदवारांना शासकीय उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहे. सुमारे दोनशे उमेदवारांना यामुळे नोकरीपासून वंचित राहवे लागणार आहे.महाराष्ट्रात जन्मलेले, शिवाय दहावी, बारावीचे शिक्षण महाराष्ट्रात घेतलेले, ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखलाही आहे, अशा उमेदवारांनासुध्दा केवळ अन्य राज्यात इंडियन नर्सिंग, दिल्ली मान्यताप्राप्त असलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबईचे मान्यता प्रमाणपत्र असतानादेखील अपात्र ठरवून भूमीपूत्रांवरच अन्याय करण्यात येत आहे, अशी कैफियत या उमेदवारांकडून मांडण्यात आली.महाराष्ट्र शासन संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्यामार्फत सरळसेवेने स्टाफ नर्स भरती परीक्षा घेण्यात आली होती. १४८९ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. अन्य राज्यात नर्सिंगचे शिक्षण घेतलेले २० महाराष्ट्रीयन उमेदवार परीक्षेस बसले होते. भरतीच्या अनुषंगाने उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणी व प्राधान्यक्रम भरण्यासाठी दि. १० ते १५ मार्च अखेर विविध केंद्रावर बोलावण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान इतर राज्यामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान इतर राज्यामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. उमेदवारांनी अपात्रतेचे कारण विचारले असता, तुम्ही नर्सिगचा कोर्स अन्य राज्यातून केला असल्याचे सांगून शासकीय सेवेतून अपात्र ठरविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे ज्यावेळी अर्ज भरण्यात आला, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला पदवीचे नाव लिहीण्यास सांगितले. बाकीचे नंतर बघू, असे सांगितल्याने अनेकांनी अर्ज भरल्याचे या उमेदवारांनी सांगितले. मात्र आता अनेक उमेदवारांची पहिल्याच परिक्षेत वणीं लागल्याने हा नवीन नियम लागू करण्यात आल्याचा आरोप रत्नागिरीतील उमेदवारांनी केला आहे. (प्रतिनिधी)

उच्च न्यायालयात धाव
आपल्याकडे कर्नाटकमधील पदवी असतानाही आपल्याला या भरतीमध्ये डावलण्यात येत असल्याने याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही उमेदवारांनी सांगितले. ही पदवी असल्याने नोकरभरतीत नाकारण्याचा कोणताही नियम नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.