शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत दापोली तालुक्याचे कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या ...

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या दाेन दिवसात तब्बल ४४७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाल्याची माहिती डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाने दिली आहे. या अतिवृष्टीत शहर व जालगाव परिसरात जवळपास कोटींचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कळंबट येथील दोन घरांचे नुकसान होऊन ५१,७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोठ्याचे २१,५०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. दापोली शहरातील व जालगाव गावातील सात दुकानांचे ४ लाख ४४ हजार रुपयांचे तर जालगाव व शहरातील ९६ नागरिकांच्या घरातील भांडी व इतर साहित्याचे जवळपास ६४ लाख ७४ हजार तर, ४५ गाड्यांचे नुकसान होऊन ३४ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लाडघर मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. तसेच सारंग या ठिकाणी रस्ता खचला होता. दापोली शहरालगत व जालगाव गावात खलाटी भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. हा भाग खोलगट असल्यामुळे पाणी भरपूर पाऊस पडल्यावर भरते, मात्र ही परिस्थिती कमी असते.

---------------

दापोली शहरातील जोग नदीला पूर येतोच, पण पाणी रस्त्यावर येत नाही. अशी घटना फार वर्षांपूर्वी नाल्याजवळ लाकडाचे ओंडके आले होते त्यामुळे घडली होती. परंतु, त्यानंतर अशी परिस्थिती प्रथमच आली आहे. याचे कारण म्हणजे शिवस्मारक येथील नाला साफ न केल्याने पाणी आले आहे.

- संदीप केळस्कर, शहराध्यक्ष, भाजप

-------------------------

महसूलच्या अधिकाऱ्यांची जालगावला भेट

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पावसातच आपत्तीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली हाेती. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनीही आपत्तीग्रस्त भागाला समक्ष भेट देऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रुप ग्रामपंचायत जालगावच्या सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावले, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम इदाते, सदस्य यांच्यासह कर्मचारी यांनी या भागात मदत कार्य केले.

---------------------

शेतीच्या नुकसानाची चाचपणी

दापोलीत झालेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शेतीचे अधिक नुकसान झाले आहे. नदी किनारी असलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, अद्याप या नुकसानाची आकडेवारी अजूनही समाेर आलेली नाही. मात्र, कृषी विभागाकडून गावोगावी चाचपणी सुरु असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्याचबरोबर शेतीचे, झाडांचे फार नुकसान झालेले नसल्याचा अंदाज देखील कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.