शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शैक्षणिक कामकाजही थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ते नववी व अकरावीच्या वर्गाच्या परीक्षा रद्द करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर गुणांकन देण्याची सूचना केली आहे. अध्यापन बंद असले तरी अशैक्षणिक कामकाज मात्र सुरू होते; परंतु लाॅकडाऊनमुळे सध्या अशैक्षणिक कामकाजही बंद ठेवण्यात आले आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा मे व जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. अद्याप त्याबाबतही पुढील सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. पहिली ते चाैथीपर्यंतचे अध्यापन ऑनलाइन सुरू होते. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले होते. नववी व अकरावीच्या परीक्षा सुरू असतानाच शासनाने परीक्षा रद्द करून गुणांकनाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आल्या, त्या शाळांमध्ये पेपर तपासणीचे काम सुरू होते. शिवाय पहिली ते नववी व अकरावीचे गुणांकन शाळा स्तरावर देण्याचे घोषित केल्याने शाळांमधून निकाल/गुणपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. वर्गनिहाय प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करण्यात येणार असून, १ मे पर्यंत निकाल घोषित करण्यात येणार होता; मात्र लाॅकडाऊनमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही शाळांमध्ये येणे शक्य नाही. त्यामुळे शाळांनी निकाल १ मे नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे घोषित केले असून, पालकांना त्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येण्यापूर्वी शाळा अध्यापनासाठी बंदचे आदेश आल्यानंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले आहे. त्यासाठी दररोज शिक्षक शाळेत येत असत. अध्यापनासमवेत गुणपत्रिकेचे काम सुरू होते; मात्र सद्यस्थितीत ऑनलाइन अध्यापन करण्यात येणार असून, गुणपत्रिका तयार करण्याचे कामही शिक्षक घरूनच करणार आहेत. शासनाकडून कडक संचारबंदी शिथिल केल्यानंतरच शिक्षक शाळेत येणार आहेत. त्यामुळे यावर्षीही परीक्षा रद्द झाली असली तरी गुणपत्रके मेच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून येणाऱ्या आदेशाची शाळांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २५७४ प्राथमिक शाळा, ४५४ माध्यमिक शाळा, १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत; मात्र सध्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ग तर अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू असले तरी अन्य सर्व वर्गातील विद्यार्थी शासनाच्या पासच्या निर्णयामुळे निर्धास्त झाले आहेत.