शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 13:49 IST

राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तालुका काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केले.

ठळक मुद्देकाँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदमचिपळूण शहरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

चिपळूण : राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तालुका काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केले.शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात सोमवारी तालुका काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष रतन पवार, काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, महिला तालुकाध्यक्षा गौरी रेळेकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, डॉ.विजय रिळकर, डॉ.दिपक विखारे, हिंदुराव पवार, वासु मेस्त्री, अल्पसंख्यांक अध्यक्ष बशीर फकीर, श्रीकृष्ण खेडेकर, सुरेश कातकर, सुरेश राऊत, नंदू थरवळ, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, स्नेहा सुर्वे, अ‍ॅड.जीवन रेळेकर, शांताराम बुरटे, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, माजी नगरसेवक रमेश खळे, युवती तालुकाध्यक्ष मुस्कान अडरेकर, युवक तालुकाध्यक्ष महेश कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यानिमित्ताने कामथे येथील अजित कासार, ग्रामपंचायत सदस्या अक्षता कासार, प्रशांत हरेकर, सचिन कासार आदींसह खेड येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर तालुक्यातील काही शाळांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, आपली ताकद दाखविल्याशिवाय गणती होणार नाही. जिल्ह्यात संयुक्त निवडणुका लढल्याने पक्ष तळागाळात पोहचला नाही. म्हणून आता अडचणी वाढल्या आहेत. यापुढे तालुक्यात संयुक्त दौरा करुन बैठका घेवून बारकाईने लक्ष दिले जाईल.

विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाच्या उमेदवाराने आमच्या कार्यकर्त्यासमोर बसावे. किती निधी देणार ते जाहीर करावेत. तरच आम्ही त्यांचे काम करु. त्याशिवाय आपली दखल घेतली जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आपणास स्वबळावर निवडणुका लढाव्या लागतील. तरच तळागाळात पक्ष पोहोचण्यास मदत होईल असे सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, विरोधी पक्षाच्या तुलनेत आपण खूपच मागे आहोत. याचा विचार करावा लागेल. मागचे दिवस फार उगाळून चालणार नाही. तालुक्यात आपली यंत्रणा घट्ट नाही. ती उभारावी लागणार आहे. सर्वसामान्याच्या प्रश्नावर आवाज उठवला तरच पक्ष मोठा होईल.

पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता हवा आहे. कार्यकर्त्यांच्या योगदानाशिवाय पक्ष मोठा होणार नाही. जुना व नवीन भेदभाव होणार नाही. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन मुराद अडरेकर यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण