शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक दोन महिने मानधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मानधनाचा तिढा अद्याप कायम आहे. जुलै व ऑगस्टचे मानधन अद्याप देण्यात न आल्याने संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डिजिटल महाराष्ट्राचे काम करणारे संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल अशा सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतचा संपूर्ण जमा-खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, १४ व्या वित्त आयोगाचा गावविकास आराखडा यासह ग्रामपंचायत ‘सांगेल ते काम’ करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी, अस्मिता योजना, जनगणना, घरकुल सर्वे, प्रधानमंत्री पीकविमा योजना इत्यादी प्रकारची महत्त्वपूर्ण कामे करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्या अद्याप दुर्लक्षित आहेत, शिवाय दोन महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. कोरोनाचा फटका सर्व आस्थापनांना बसला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संगणक परिचालक काम करीत असून, त्यांना आवश्यक स्टेशनरीही मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक गणेशोत्सव असल्याने मानधन वेळेवर होणे आवश्यक होते. सणासुदीच्या काळातही उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून लोकसंख्येच्या आधारावर संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाभरात ५५० संगणक परिचालक कार्यरत आहेत. ग्रामपंचायत तेथे इंटरनेट, संगणक प्रणाली जोडण्यात येऊन पेपरलेस ग्रामपंचायतीचा कारभार सुरू झाला. संपूर्ण राज्यासाठी यंत्रणा राबविण्यासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीकडून संगणक परिचालकांचे मानधन वेळेवर दिले जात नाही. या कंपनीला प्रत्येक ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगामधून वार्षिक एक ते दीड लाख रुपये जमा करण्यात येतात. संगणक परिचालकांचे मानधन व ग्रामपंचायतींना लागणारी स्टेशनरी पुरविण्याचे कंत्राट या कंपनीला देऊ केले आहे. मात्र, संबंधित कंपनीकडून मानधन व स्टेशनरी कधीच वेळेवर दिली जात नाही.

--------------------

डिजिटल महाराष्ट्राचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांकडून काम करून घेत असताना दोन-तीन महिने मानधन दिले जात नाही. ग्रामपंचायतीकडून मानधनाची रक्कम कंपनीकडे आधीच जमा करुनही मानधन काढण्याकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आता तरी संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.

- हरिष वेदरे, जिल्हाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना