शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणकर अजूनही पिताहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापूर ओसरून आज दोन महिने उलटले तरी त्याचे परिणाम चिपळूणकरांना अजूनही भोगावे लागत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापूर ओसरून आज दोन महिने उलटले तरी त्याचे परिणाम चिपळूणकरांना अजूनही भोगावे लागत आहेत. पुरासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने वाशिष्ठी नदी गढूळ झाली. त्यानंतर आजतागायत ही परिस्थिती कायम आहे. परिणामी या नदीवरील नगर परिषद व अन्य ग्रामपंचायतींच्या पाणी योजनेतून गढूळ पाणीपुरवठा होत असून, शहरातील अनेक हॉटेलमध्येही तीच परिस्थिती असल्याने ग्राहकांसह नागरिक हैराण झाले आहेत.

येथे २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने चिपळूणकरांची दयनीय अवस्था केली. या महापुरात अवघे चिपळूण शहर उद्ध्वस्त झाले. या प्रसंगातून चिपळूणकर आजही सावरलेले नाहीत. महापुरामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमध्ये गढूळ पाण्याची समस्या डोकेदुखी बनली आहे. अतिवृष्टीत कोयना धरणापासून कोळकेवाडी धरणाकडे येणाऱ्या जलप्रवाहात डोंगराचा मोठा भाग खचल्याने तेथील माती मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीला वाहून आली. गाळाचे हे प्रमाण इतके होते की शहरातील बहुतांशी रस्ते गाळात रुतले होते. पूर ओसरल्यानंतरही केवळ गाळामुळे काही गावांचा व वाडी वस्तीचा संपर्क काही दिवस तुटला होता. त्यातच बहुतांशी भागातील शेतीचे गाळामुळे अस्तित्वच संपून गेले आहे.

अजूनही अनेक ठिकाणी गाळ साचलेला असून पावसासोबत तो थेट नदीपात्रात वाहून येतो. पूर ओसरल्यानंतरही सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी नदीचे पाणी आजही गढूळ आहे. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या पाणी योजनांनाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. विशेषतः नगर परिषदेच्या दोन्ही जॅकवेल वाशिष्ठी नदीवर असून, या पाणी योजनेलाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. काही योजनांचे पंपहाऊस गाळामुळे निकामी झाले. अजूनही काही योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याच पद्धतीने अनेक हॉटेलमधील कुलर व शुद्धीकरण केंद्र निकामी झाल्याने अनेक ठिकाणी गढूळ पाणी ग्राहकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढली आहे.

.................

...तर धोका वाढला असता!

महापूर ओसरल्यानंतर काही तासांतच रत्नागिरी, जयगड, अलिबाग व अन्य भागांतील अनेक सामाजिक संस्था पाण्याच्या बाटल्या घेऊन दाखल झाले. त्यानंतर किमान पंधरा दिवस सातत्याने पाण्याचा पुरवठा केला जात होता. लाखोंच्या संख्येने बाटल्या पुरविण्यात आल्या. त्यामुळे या कालावधीत साथीच्या रोगांवर नियंत्रण राहिले. मात्र, आता पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात नसल्याने त्याचा परिणाम दिसू लागला आहे. शहरासह लगतच्या गावांमध्येही डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीचे रुग्ण आढळून येत आहेत.