शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण, खेडची पावसाची सरासरी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ३६६.६८ मिलिमीटर जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, यावर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या चिपळूण व खेडमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे मिळालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये श्रावण सरी कोसळत असून, ऊन आणि पावसाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. जुलै महिन्यातील पावसाच्या धुवाॅंधार विक्रमी नोंदीनंतर आता गणेशोत्सवाचे वेध लावणारे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. दि. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात हाहाकार उडाला होता. इतिहासाच्या पानातील पर्जन्यमानाच्या नोंदी पाऊस मोडणार, असे अंदाज अनेक तज्ञांनी मांडले होते. रायगडमधील महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळून अनेकांचे जीव गेले तर कोट्यवधी रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसानदेखील झाले आहे. परंतु, हाहाकार उडवणाऱ्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या खेड व चिपळूण तालुक्यांना बसला त्या तालुक्यांत गतवर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी खेडमध्ये ४,०७४ मिलिमीटर तर चिपळूणमध्ये ३४०१.९२ एवढी पावसाची एकूण नोंद झाली होती. परंतु, यावर्षी दि. १ जून ते दि. २२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खेडमध्ये ३३६७.८० मिलिमीटर तर चिपळूणमध्ये २८७७.९० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये मंडणगड - ३०२६.५०, दापोली - २५५९.८०, गुहागर - ३०२४.९०, संगमेश्वर - ३०८८.८०, रत्नागिरी - ३१७०.६०, लांजा - २९८४.९०, राजापूर - २७९२.९० असा एकूण पाऊस नोंदविण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गेल्यावर्षीपेक्षा अधिक सरासरी गाठल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. खेडमधील नातूवाडी धरण ८६.५६ टक्के भरले असून, धरणात २३.५६९ द. ल. घ. मी. पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील गडनदी संगमेश्वर धरण - ८०.०८ टक्के, अर्जुना राजापूर धरण - १०० टक्के, मुचकुंदी लांजा धरण - १०० टक्के भरले आहे.

--