शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 4:13 PM

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ...

ठळक मुद्दे रत्नागिरी पोलिसांचे कडक धोरणफिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना तासभर बसण्याची शिक्षा शहरातील विविध भागात कडक पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरीपोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना एकाच जागेवर एक तास बसून ठेवण्याची शिक्षा गुरूवारी देण्यात आली होती. तर शुक्रवारी सकाळी अवघ्या एका तासात तब्बल ४४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. चर्मालय, आयसीआयसी बँक आणि उद्यमनगर येथे ही कारवाई करण्यात आली.थोडीशी शिथिलता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विनाकारण लोक घराबाहेर पडू लागल्याने रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपासून कारवाई कठोरपणे सुरू केली. गुरुवारी वाहन घेऊन आणि मैदानावर वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ९.५० ते ११ या मुदतीत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने अचानक कडक नाकाबंदी केली.चर्मालय तिठा, आयसीआयसी बँक चौक, उद्यमनगर चौक परिसर या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून ४४ वाहन चालकांवर कारवाई केली. तसेच विनाकारण फिरणारे वाहने जप्ती व वाहनांवर हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रोडवर किरकोळ कारणांकरीता फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन बाहेर न फिरण्याबाबत समज दिली. अशा प्रकारची मोहीम सुरुच राहणार असून वाहन जप्ती कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत जवळजवळ १०० दुचाकी जप्त केल्या आहेत. तर चारचाकी वाहनेदेखील जप्त केली आहेत. ही सर्व वाहने पोलीस कवायत मैदानावर ठेवण्यात आली असून, लॉकडाऊन संपल्यानंतरच सर्व वाहने परत दिली जाणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणPoliceपोलिस