शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

घंटा वाजली, शाळा भरली, आईची काळजी अजूनच वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने एका महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना रुग्ण नसलेल्या गावातून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने एका महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना रुग्ण नसलेल्या गावातून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४६५ शाळांपैकी पाच शाळांचे अध्यापन प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी अशा स्थितीत मूल शाळेत जाणार म्हणून प्रत्येकाची आई मात्र काळजीतच आहे.

प्रत्यक्ष वर्ग सुरू करताना, सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव संमत करण्याची सूचना केली हाेती. त्यानुसार पाच गावांतून ठराव संमत करण्यात येऊन शाळा सुरू करण्याबाबत पालकांचीही संमत्ती घेण्यात आली. जिल्ह्यातील ८४९ गावे काेरोनामुक्त झाली असताना अवघ्या पाच गावांमधील पालकांनीच शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. मात्र सर्वत्र सुरू असलेले लसीकरण, आरोग्य यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. विद्यार्थीही घरी राहून कंटाळले असून ऑनलाइन अध्यापनात भेडसावणाऱ्या समस्यांमुळे मुलेही शाळेत जाण्यासाठी उत्सुक झाली आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या पाच शाळांमध्ये २५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली असून टप्प्याटप्प्यांनी उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. पालकांची संमती मिळाल्यानेच वर्ग सुरू झाले आहेत.

काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे!

माझी मुलगी बारावीला आहे. कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू झाले होते, मात्र बऱ्याच वेळा नेटवर्कमुळे समस्या निर्माण होत असत. शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर गावात बैठक घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी शाळेत पाठवत आहे.

- मानसी मंगेश डिके, पालक, तुरळ

गेले दीड वर्ष शाळा प्रत्यक्ष बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापन करण्यात येत आहे. परंतु शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली, त्यावेळी आमचीही शाळा सुरू करण्यात आली आहे. मुलांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी वाटते, परंतु शाळेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

- सदिच्छा पाचकले, पालक, तुरळ

कोरोना महामारीत ऑनलाइन अध्यापन स्तुत्य उपक्रम होता. मात्र शाळेतील अध्यापन व ऑनलाइन अध्यापनात कमालीचा फरक आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असणे व वेळेची मर्यादा या दोन्ही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. कोरोनामुळे मुलांच्या आरोग्य सुरक्षेबाबत काळजी वाटते. परंतु ग्रामपंचायत, शाळा विशेष दक्षता घेत असल्याने मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटत नाही.

- शर्मिला येलाेंडे, पालक, तुरळ

शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघाेळही करा!

चार तास सलग वर्ग भरविण्यात येत आहेत. शाळेतून सुटल्यानंतर मुलांना घरी आल्यानंतर थेट आंघोळीला पळावे लागते. खबरदारी म्हणून गणवेष दररोज धुऊन घातला जात आहे. शाळेत येताच मुलांची ऑक्सिजन मात्रा, तापमान तपासले जात आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात आहे. मास्क लावणे तर सक्तीचा असून पालक मुलांना जादा मास्क दप्तरातून देत आहेत. वर्ग सुटल्यानंतर मुले थेट घरी जात आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात आहे. शिक्षकही येता-जाता मुलांवर लक्ष ठेवून आहेत.