शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ६२७ ग्रामसेवक कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पडत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील ६२७ ग्रामसेवक ...

रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पडत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील ६२७ ग्रामसेवक कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यापासून ते ग्रामस्थांना लागणाऱ्या सोयीसुविधांसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ग्रामसेवकांना शाब्बासकीची थाप दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगला परिणाम जिल्ह्यात जाणवत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यावर नियंत्रण ठेवताना प्रशासनालाही कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाडी-वस्तीवर झाला आहे. आरोग्य यंत्रणा पोचविण्यासाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कोरोनाबाधितांचा शोध घेणे हा मुख्य उद्देश असून गृह भेटीतून प्रचार व प्रसारही केला जातोय. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ यांच्यात ग्रामसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरत आहे. लोकप्रतिनिधी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्याबरोबरीने ग्रामसेवकही या पथकात काम करत आहेत.

गावात योजना राबविण्यात हीच यंत्रणा सर्वात महत्त्वाची ठरत आहे. आतापर्यंत होम आयसोलेशन, कंटेन्मेंट झोन बनविण्यापासून ते अगदी कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती शासनाकडे पाठविण्यापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुक्त गावे ठेवण्यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. गावांसह बाजारपेठ परिसरात सॅनिटायझर, घरोघरी धान्य वाटप, परजिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांना राहण्याची व्यवस्था अशा प्रकारची कामेही ग्रामसेवकांमार्फत सुरू आहेत.

---------------------------

ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची

जिल्हा दौऱ्याच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी गावपातळीवर सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामसेवकांसह ग्राम कृती दलांनी पहिल्या लाटेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याप्रमाणे सध्या माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नातून ही लाट थोपवण्यास मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.