शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन्य जीव सप्ताह विशेष - निसर्गाच्या संतुलनासाठी प्राण्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 05:22 IST

निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो.

दाजी कोळेकर

निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो. प्राणी म्हटल्यावर मग त्यामध्ये माणूस देखील आला; पण माणूस व इतर प्राणी यांच्यामध्ये मोठा फरक असून माणूस हा प्रगतशील प्राणी आहे. त्यामुळे प्राणी म्हणजे साधारणपणे इतर प्राणी असे समजले जाते.

अलीकडे अशा मानवेत्तर प्राण्यांची संख्या, जीवनमान, निसर्गातील असंतुलन याचा विचार करून त्यांचा खास असा दिवस असावा अशा विचारातून जागतिक प्राणी दिन साजरा करण्यात सुरुवात झाली. ४ आॅक्टोबर रोजी दरवर्षी प्राणिदिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या दिवशी प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. तसेच प्राण्यांविषयी गैरसमज, भीती, त्याचे फायदे वा उपयोग, महत्त्व याविषयी जनजागृती घडवून निसर्गाच्या संतुलनासाठी त्यांची योग्य संख्या ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, असे स्वरूप असते.

भारतासह जगभरातील प्राण्यांच्या अनेक जाती दुर्मीळ तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्राण्यांच्या प्रजाती नव्याने निर्माण होण्यासाठी व निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांचे महत्त्व ओळखून त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्राण्यांशिवाय मानवी जीवन शून्य आहे. मानव हा जरी प्राणी असला तरी प्राण्यांचे अर्थकारण मोठे असून, अनेक देशांनी यावर लक्ष केंद्रित केले आहे.मानवी जीवनाच्या कल्याणामध्ये प्राण्यांचे मोठे योगदान व महत्त्व असून, अनेक पाळीव प्राणी प्रगतीचे आधार ठरत आहेत. जगातील मोठ्या व्यवसायात दुग्धव्यवसाय असून, त्यामध्ये भारतानेही मोठी प्रगती केली आहे. त्याचा आधार हे प्राणीच आहेत. दुग्धव्यवसाय अर्थात पशुधन यामुळे लाखो हातांना रोजगार मिळाला, शेती विकासासाठी आधारभूत ठरला आहे. पशुधनामुळे भारताची मोठी प्रगती झाली असून, श्वेतक्रांती झाली आहे.भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्यांवर प्रेम वा दया करणारे अनेक सण-उत्सव आहेत; पण त्याविषयी जनजागृती फारशी दिसून येत नाही. त्यामुळे अशा दिनानिमित्त प्राण्यांवर दया करणे, त्यांची गरज, महत्त्व आणि आपले कुटुंब, देश व मानवी जीवनाच्या कल्याणातील योगदान याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच मानवी जीवन सुखकर होण्यासाठी, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व वन्य प्राण्यांची योग्य प्रमाणात संख्या ठेवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होण्यासाठी चर्चा व्हावी, या अनुषंगाने या दिनानिमित्त चर्चा व जनजागृती झाली तरीसुद्धा हा दिन सफल झाला, असे म्हणता येईल.पशुगणना सुरूच्आपल्या देशात किती पशू आहेत याची माहिती संकलित करण्यासाठी सरकारच्या वतीने पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते.च्ही गणना १ आॅक्टोबरपासून नुकतीच सुरू झाली असून ती ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये देशभरात प्रत्येकाकडे कोणकोणते पाळीव प्राणी आहेत याची गणना करून माहिती संकलित करून, त्यावरून शासकीय धोरण वा योजना निश्चित करण्यात येतात. ही गणना यंदा प्रथमच आॅनलाइन प्रणालीने करण्यात येणार आहे.भारतासह जगभरातील प्राण्यांच्या अनेक जाती दुर्मीळ तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्राण्यांच्या प्रजाती नव्याने निर्माण होण्यासाठी व निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांचे महत्त्व ओळखून त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Raigadरायगड