शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

वन्य जीव सप्ताह विशेष - निसर्गाच्या संतुलनासाठी प्राण्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 05:22 IST

निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो.

दाजी कोळेकर

निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो. प्राणी म्हटल्यावर मग त्यामध्ये माणूस देखील आला; पण माणूस व इतर प्राणी यांच्यामध्ये मोठा फरक असून माणूस हा प्रगतशील प्राणी आहे. त्यामुळे प्राणी म्हणजे साधारणपणे इतर प्राणी असे समजले जाते.

अलीकडे अशा मानवेत्तर प्राण्यांची संख्या, जीवनमान, निसर्गातील असंतुलन याचा विचार करून त्यांचा खास असा दिवस असावा अशा विचारातून जागतिक प्राणी दिन साजरा करण्यात सुरुवात झाली. ४ आॅक्टोबर रोजी दरवर्षी प्राणिदिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या दिवशी प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. तसेच प्राण्यांविषयी गैरसमज, भीती, त्याचे फायदे वा उपयोग, महत्त्व याविषयी जनजागृती घडवून निसर्गाच्या संतुलनासाठी त्यांची योग्य संख्या ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, असे स्वरूप असते.

भारतासह जगभरातील प्राण्यांच्या अनेक जाती दुर्मीळ तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्राण्यांच्या प्रजाती नव्याने निर्माण होण्यासाठी व निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांचे महत्त्व ओळखून त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्राण्यांशिवाय मानवी जीवन शून्य आहे. मानव हा जरी प्राणी असला तरी प्राण्यांचे अर्थकारण मोठे असून, अनेक देशांनी यावर लक्ष केंद्रित केले आहे.मानवी जीवनाच्या कल्याणामध्ये प्राण्यांचे मोठे योगदान व महत्त्व असून, अनेक पाळीव प्राणी प्रगतीचे आधार ठरत आहेत. जगातील मोठ्या व्यवसायात दुग्धव्यवसाय असून, त्यामध्ये भारतानेही मोठी प्रगती केली आहे. त्याचा आधार हे प्राणीच आहेत. दुग्धव्यवसाय अर्थात पशुधन यामुळे लाखो हातांना रोजगार मिळाला, शेती विकासासाठी आधारभूत ठरला आहे. पशुधनामुळे भारताची मोठी प्रगती झाली असून, श्वेतक्रांती झाली आहे.भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्यांवर प्रेम वा दया करणारे अनेक सण-उत्सव आहेत; पण त्याविषयी जनजागृती फारशी दिसून येत नाही. त्यामुळे अशा दिनानिमित्त प्राण्यांवर दया करणे, त्यांची गरज, महत्त्व आणि आपले कुटुंब, देश व मानवी जीवनाच्या कल्याणातील योगदान याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच मानवी जीवन सुखकर होण्यासाठी, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व वन्य प्राण्यांची योग्य प्रमाणात संख्या ठेवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होण्यासाठी चर्चा व्हावी, या अनुषंगाने या दिनानिमित्त चर्चा व जनजागृती झाली तरीसुद्धा हा दिन सफल झाला, असे म्हणता येईल.पशुगणना सुरूच्आपल्या देशात किती पशू आहेत याची माहिती संकलित करण्यासाठी सरकारच्या वतीने पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते.च्ही गणना १ आॅक्टोबरपासून नुकतीच सुरू झाली असून ती ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये देशभरात प्रत्येकाकडे कोणकोणते पाळीव प्राणी आहेत याची गणना करून माहिती संकलित करून, त्यावरून शासकीय धोरण वा योजना निश्चित करण्यात येतात. ही गणना यंदा प्रथमच आॅनलाइन प्रणालीने करण्यात येणार आहे.भारतासह जगभरातील प्राण्यांच्या अनेक जाती दुर्मीळ तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्राण्यांच्या प्रजाती नव्याने निर्माण होण्यासाठी व निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांचे महत्त्व ओळखून त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Raigadरायगड