शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

मुंबई-गोवा महामार्ग रुतला चिखलात; वाहनचालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:45 AM

ठिकठिकाणी खड्डे : चौपदरीकरणाचे काम संथ गतीने; महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भरावामुळे दुरवस्था

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने होत असल्याने आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संचारबंदी लागू केल्याने, महामार्गाचे काम ठप्प झाले. यामुळे ऐन पावसाळ्यात नवीन रस्त्याकरिता टाकलेला भराव आणि खड्ड्यांनी संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.

दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाेचे चौपदरीकरण २०१४ पूर्वीपासून सुरू आहे. इंदापूर ते पळस्पेदरम्यान पहिल्या टप्प्यात नवीन आणि जुन्या महामार्गाचे वाटोळे झाल्यानंतर लगेचच इंदापूर ते कशेडी या दुसºया टप्प्याला प्रारंभ झाला. यामध्येही गती येत नसल्याचे दिसून येत आहे. २०२० पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, शासकीय परवाने, शेतकऱ्यांचे प्रश्न, मातीची उपलब्धता आदी अडचणींमुळे हे काम रखडले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून महामार्गाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे ऐन पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाºया दुरुस्तीचे काम झाले नाही. महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भराव, खोदकाम, यामुळे जुन्या रस्त्यावर ऐन पावसाळ्यात मातीचा चिखल आणि खड्डे तयार झाले. आजही ही दुरुस्ती पूर्ण न झाल्याने, रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.जागोजागी निर्माण केलेल्या पर्यायी मार्गावर डांबर शिल्लक राहिले नाही, यामुळे पर्यायी मार्गाचा चिखल रस्त्यावर आला आहे. जुना मार्ग आणि पर्यायी मार्गावरील डांबर निघून गेल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महाडजवळ दासगावपासून गांधारपाले, पुढे नातेखिंड ते नांगलवाडीपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात टाकल्या जाणाºया भरावाची अवजड वाहनांमुळे वाट लागत आहे.दुरवस्थेमुळे रुग्णांना त्रासच्कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचे निर्मूलन यावर शासनाने भर दिल्याने या विकासकामांकडे दुर्लक्ष केले आहे. कोकणातून रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाताना याच महामार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र, महामार्गाच्या दयनीय अवस्थेने रुग्णवाहिकेचे आणि रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर रुग्ण रुग्णालयातपोहोचत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Raigadरायगड