शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
3
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
4
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
5
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
6
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
7
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
8
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
9
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
10
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
11
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
12
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
13
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
14
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
15
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
16
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
17
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
18
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
19
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
Daily Top 2Weekly Top 5

धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग; गणेशोत्सवापूर्वी उपाययोजनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 06:21 IST

पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे.

पेण : येथील खारपाडा-जिते गावापासून ते थेट वडखळ-डोलवी गावापर्यंत १९ किमी अंतरावरील टप्प्यात कडक पडत असलेल्या उन्हात महामार्गावर धुळीचे लोट वाहने चालवताना उडत आहेत. या धुळीचा वाहनचालक, प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाशी संबंधित आजारात वाढ झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धूळमिश्रित वातावरण गेले पाच, सहा दिवस सुरू आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला याचे सोयरसुतक नाही. यामुळे प्रवासी, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आरोग्याला बाधा आणणारे वातावरण महत्त्वाच्या अशा या मुंबई-गोवा महामार्गावर आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना महामार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला याबाबत नागरिकांकडून उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.
पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे. वीकेंडला होणारी वाहतूककोंडी असो, अपघात असो वा ऐन पावसाळ्यात सुरू केलेला पेण शहराच्या समोरील मातीचा भराव. रेल्वे स्थानकासमोरचा पूल, रामवाडी पूल या कामामुळे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने जनतेला वेठीस धरले होते. या त्रासात या धुळीने भर घातल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गावरील धुळीच्या उडणाºया लोटामुळे वाहतूक ही मंद गतीने सुरू आहे. समोरचे वाहन धुळीच्या लोटांमुळे नीट दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशा या परिस्थितीत वाहतूक पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. धुळीच्या त्रासामुळे होणारे आजार व आर्थिक भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे. यासाठी आता जनतेलाच पुढे येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागणार आहे.

वाहनचालकांना करावी लागतेय कसरत
कार्लेखिंड : मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्यावरील धुळीमुळे प्रवासी हैराण होत आहेत. प्रवाशांबरोबरच आजूबाजूची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग असो किंवा राज्यमार्ग असो सर्व रस्त्यावरील अवस्था सध्या स्थितीला हीच आहे. चालू पावसाळ्यात मुंबई - गोवा महामार्गावर तरणखोप ते वडखोप खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि त्याचबरोबर अपघात होत आहेत. यावर उपाय म्हणून खड्डे भरण्याचे काम सतत चालू आहे. चालू पावसात खड्ड्यात मातीमिश्रित खडी टाकली जाते आणि खड्डे भरले जातात, परंतु तेच खड्डे पुन्हा पुन्हा तयार होत आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील मातीचे रूपांतर धुळीत झाले आहे. अवजड वाहने सतत वेगाने चालू असल्याने रस्त्यावरील धुळीचा डोंब अगदी धुक्यासारखा होत आहे. या धुळीमुळे समोरचे वाहन सुद्धा दिसत नाही. परंतु या धुळीचा त्रास सर्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. तसेच महामार्ग किंवा रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा या धुळीला सामोरे जावे लागत आहे. या धुळीमुळे सर्वांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.