शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग; गणेशोत्सवापूर्वी उपाययोजनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 6:21 AM

पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे.

पेण : येथील खारपाडा-जिते गावापासून ते थेट वडखळ-डोलवी गावापर्यंत १९ किमी अंतरावरील टप्प्यात कडक पडत असलेल्या उन्हात महामार्गावर धुळीचे लोट वाहने चालवताना उडत आहेत. या धुळीचा वाहनचालक, प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाशी संबंधित आजारात वाढ झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धूळमिश्रित वातावरण गेले पाच, सहा दिवस सुरू आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला याचे सोयरसुतक नाही. यामुळे प्रवासी, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.आरोग्याला बाधा आणणारे वातावरण महत्त्वाच्या अशा या मुंबई-गोवा महामार्गावर आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना महामार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला याबाबत नागरिकांकडून उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे. वीकेंडला होणारी वाहतूककोंडी असो, अपघात असो वा ऐन पावसाळ्यात सुरू केलेला पेण शहराच्या समोरील मातीचा भराव. रेल्वे स्थानकासमोरचा पूल, रामवाडी पूल या कामामुळे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने जनतेला वेठीस धरले होते. या त्रासात या धुळीने भर घातल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गावरील धुळीच्या उडणाºया लोटामुळे वाहतूक ही मंद गतीने सुरू आहे. समोरचे वाहन धुळीच्या लोटांमुळे नीट दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशा या परिस्थितीत वाहतूक पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. धुळीच्या त्रासामुळे होणारे आजार व आर्थिक भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे. यासाठी आता जनतेलाच पुढे येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागणार आहे.वाहनचालकांना करावी लागतेय कसरतकार्लेखिंड : मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्यावरील धुळीमुळे प्रवासी हैराण होत आहेत. प्रवाशांबरोबरच आजूबाजूची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग असो किंवा राज्यमार्ग असो सर्व रस्त्यावरील अवस्था सध्या स्थितीला हीच आहे. चालू पावसाळ्यात मुंबई - गोवा महामार्गावर तरणखोप ते वडखोप खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि त्याचबरोबर अपघात होत आहेत. यावर उपाय म्हणून खड्डे भरण्याचे काम सतत चालू आहे. चालू पावसात खड्ड्यात मातीमिश्रित खडी टाकली जाते आणि खड्डे भरले जातात, परंतु तेच खड्डे पुन्हा पुन्हा तयार होत आहेत.पावसाने विश्रांती घेतल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील मातीचे रूपांतर धुळीत झाले आहे. अवजड वाहने सतत वेगाने चालू असल्याने रस्त्यावरील धुळीचा डोंब अगदी धुक्यासारखा होत आहे. या धुळीमुळे समोरचे वाहन सुद्धा दिसत नाही. परंतु या धुळीचा त्रास सर्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. तसेच महामार्ग किंवा रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा या धुळीला सामोरे जावे लागत आहे. या धुळीमुळे सर्वांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.