शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

मर्कटलीलांनी बागायतदार हवालदिल, फळांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 1:07 AM

फळांचे नुकसान : वनविभागाने कारवाई करण्याची मागणी

अभय आपटे

रेवदंडा : अलिबाग तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या निसर्गरम्य आक्षी, नागांव, चौल आणि रेवदंडा गावातील बागांमध्ये माकडांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. ही माकडे काही फळे खातात तर त्यापेक्षा अधिक फेकून देतात. त्यामुळे या मर्क टलीलांनी बागायतदार हवालदिल झाले आहेत. यामुळे वनविभागाने योग्य करवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी के ली जात आहे.

नारळ-सुपारीच्या बागा हे नागाव-रेवदंडा परिसराचे वैशिष्ट्य आहे. मुरुड-अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना या बाजा भुरळ घालतात. त्यामुळेच येथील धार्मिक स्थळे पाहिल्यानंतर पर्यटक काही वेळ बागांच्या सानिध्यात विसावतात. आंबा, फणस, चिकू, पेरू, अननस, पपनीस, केळी, रामफळ, पपई आदी फळांची झाडेही येथे आहेत. चाफा, गुलाब, मोगरा, आबोली ही फुलेही बहरतात, तर वाल, पावटा, कडधान्ये पिकवली जातात. गेली अनेक वर्षे बागा व शेतीला नैसर्गिक आपत्तीची दृष्ट लागली असताना. कोळे रोगामुळे सुपारी गळून नुकसान होत आहे. चार वर्षांपासून इरीफाइड रोगाचा नारळाला प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे या फळाला आकार कमी होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. काही वर्षांपासून बागायतीला आणि शेतीला माकडांच्या उच्छादामुळे फटका बसला आहे. माकडांच्या टोळ्या फळझाडे झोडपून काढतात. अशा विविध कारणाने शेतकरी सतत अडचणीत येत आहे. चौल-रेवदंडा परिसरात माकडांचा उच्छाद पाहता बागांचे होणारे नुकसान पाहता त्यांना वनीकरण विभागाने पकडून भीमाशंकर, फणसाड व कर्नाळा अशा जवळच्या अभयारण्यात सोडण्यात यावे, अशी मागणी चौल चौकी परिसरातील बागायतदार विश्वास जोशी यांनी केली आहे.बाजारपेठांमध्येही मुक्तसंचारबागायतदारांचे, शेतीचे नुकसान करणारी माकडे आता मानवी वस्तीत घुसून बाजारपेठेतील एका घरावरून दुसºया घरावर उड्या मारतात. वेळ पडली तर वीज वितरण कंपनीच्या वीजवाहिनींचा आधार घेतात, त्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. काही प्रसंगी एका घरावरून दुसºया घरावर उडी मारताना रस्त्यावर पडून अपघातही घडत आहेत. दूरध्वनी वाहिन्यांवरून उड्या मारत असल्याने दूरध्वनी बंद पाडतात. घरांवरील पत्रे, कौले यांच्या नुकसानीची गणतीच नाही, यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.

टॅग्स :MonkeyमाकडRaigadरायगड