शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

कोरोना नियंत्रणासाठी शासन, प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:25 PM

प्रवीण दरेकर यांचा आरोप : महाडमधील एमएमए कोरोना सेंटरची पाहणी करुन घेतली पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : कोरोना नियंत्रणाच्या कामामध्ये सरकारच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे. कोणत्याही यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती खालावत चालली आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्याबाबत शासन आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

आ. प्रवीण दरेकर यांनी महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमए कोरोना सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. महाड, उत्पादक संघटनेचे (एम.एम.ए.) अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी या सेंटरची माहिती त्यांना दिली. या वेळेस भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आणि महाड येथील मनोज खांबे यांनी या कोरोना सेंटरच्या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या. बिपीन म्हामुणकर यांनी या कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणारे रॅकेट कार्यरत असल्याचा थेट आरोप केला.

या कोरोना सेंटरची पाहणी केल्यानंतर, महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या रॅकेटसंदर्भात दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकाराची चौकशी करण्यास आपण सरकारला भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याच वेळेस शासनाने आश्वासन देऊनही या कोरोना केअर सेंटरला कोणतीही मदत न केल्याने हे सेंटर चालविताना एमएमएची दमछाक होत असल्याचा दावादेखील दरेकर यांनी केला.

रायगड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहोत, त्याचप्रमाणे आपत्ती निवारण योजनेतून महाड येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ८४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आपत्ती निवारण आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. कोरोना सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स नेमण्यात यावेत यासाठी आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. या वेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.रहिवाशांना भाड्याचीघरे उपलब्ध करून द्यातारिक गार्डन इमारतीमधील रहिवाशांचे सध्या हॉलमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याऐवजी शासनाने त्यांना भाड्याची घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेले असंख्य वादळग्रस्त आजही नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.