शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भरावामुळे घारापुरी बेटाची धूप

By admin | Updated: December 27, 2016 02:41 IST

जेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध

- मधुकर ठाकूर,  उरणजेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध बंदिस्ती, संरक्षक तट सागरी लाटांमुळे पार उद्ध्वस्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी बेटालगत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर संरक्षक भिंतीचे काम झालेच नसल्याने बेटावरील चहुबाजूंच्या सागरी किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. घारापुरी बेटावर समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून १० मीटर आत घुसू लागले आहे. रहदारीचे रस्तेही पाण्याखाली जाऊ लागले आहेत. बेटाच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली. तेव्हापासून बंदराचा विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबीचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड, मातीचे भराव के ले आहेत. समुद्रात होत असलेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. परिणामी समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती, संरक्षक तट उद्ध्वस्त करीत बेटांवरील गावांच्या दिशेने वाढू लागले आहे. जेएनपीटीच्याकामामुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ नवी मुंबई यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. या जनसुनावणीदरम्यान प्रकल्प आणि पर्यावरणाबाबत तक्रारी, सूचना, टीका टिप्पणीवर चर्चा केली जाणार आहे. जनसुनावणीला अनुसरून शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.पर्यटक आणि नागरिकांसाठी रहदारीसाठी असलेले प्रमुख रस्तेही इतिहासजमा होण्याच्या स्थितीत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास आणि त्याकडे शासन, जेएनपीटीने वेळीच लक्ष दिल्यास बेटावरील रहदारीसाठी उरलेले रस्तेही समुद्राच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती बळीराम ठाकूर यांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे. जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर देश-विदेशातून वर्षभर लाखो पर्यटक ऐतिहासिक लेणी पाहण्यासाठी येतात. मात्र अशा या जागतिक दर्जा लाभलेल्या बेटासभोवार असलेल्या सागरी किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होवून समुद्राच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे शासनानेही दुर्लक्षच चालविलेले आहे. जेएनपीटीच्या विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात सातत्याने होणाऱ्या प्रचंड भरावामुळे सागरी किनाऱ्यांची होणारी धूप, समुद्राच्या सातत्याने वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे बेटाला होऊ पाहणाऱ्या धोक्याबाबत जेएनपीटीने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी घारापुरी ग्रा. पं. ने केली होती. बेटावर समुद्रातून येणारा कचरा, प्लास्टिक आणि तेलतवंगामुळे सागरी किनारा पार काळवंडला आहे. तसेच दुर्मीळ खारफुटीची झाडेही नष्ट होत चालली आहेत. सातत्याने येणाऱ्या कचऱ्यामुळे किनारपट्टी दुर्गंधीयुक्त बनत चालली आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायही अडचणीत आला आहे. बेटाच्या होत चाललेल्या विद्रूपीकरणाचे विदेशीपर्यटक चित्रीकरण करीत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील बेटाचे नाव खराब होत चालले आहे. याकडेही बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तक्रारीतून लक्ष वेधले आहे. जेएनपीटीच्या चॅनेलची खोली वाढविणे, चौथे बंदर उभारण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या भरावामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. सागराच्या प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोरा बंदर, राजबंदर या तिन्ही गावांवर असलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. सर्वाधिक राजबंदर जेट्टी ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची, समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने पार दुर्दशा झाली आहे. जमिनीच्या झालेल्या प्रचंड धूपमुळे पार खचून गेला आहे.- बळीराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, घारापुरी