शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

दिवाळीच्या ताेंडावर सरकारी नाेकरी, अनुकंपा तत्त्वावरील ५० जण नियुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:57 AM

Raigad News : सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. 

- आविष्कार देसाईरायगड - सरकारी नाेकरीकडे डाेळे लावून बसलेल्या अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा यादीवरील तब्बल ५० उमेदवारांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.किरण पाटील यांनी या नियुक्त्यांच्या फायलीवर स्वाक्षऱ्या करून ऐन दिवाळीच्या ताेंडावर उमेदवारांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना अतिशय कष्टमय जीवन जगावे लागले आहे. कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षणही पूर्ण केले आहे. मात्र, त्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील फायली वर्षानुवर्षे गठ्ठ्यात दबल्या गेल्या हाेत्या. त्या आता बाहेर काढून मृतांच्या वारसांना न्याय देण्याचे काम डाॅ.पाटील यांनी केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषदेकडे एकूण ७९ अर्ज आले हाेते. पैकी ५० उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आराेग्यसेवक पुरुष-११, ग्रामसेवक-१०, परिचर-९, शिक्षक-५, पर्यवेक्षिका-३, स्त्री परिचर-३, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-२, वरिष्ठ सहायक लिपिक-२, कनिष्ठ अभियंता बांधकाम-२, कनिष्ठ सहायक लेखा-२, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा)-१, औषध निर्माण अधिकारी-१ यांचा समावेश आहे. वेळाेवेळी निर्गमित झालेल्या सरकारी निर्णयाच्या अधिन राहून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.सरकारच्या याेजना सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम आहे. दीर्घ कालावधीपासून अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचा प्रश्न प्रलंबित हाेता. मृतांच्या वारसांना वेळेवर त्यांचा हक्क मिळणे गरजेचे हाेते. यासाठी निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पाठबळ मिळाले.- डाॅ. किरण पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद 

सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना शिक्षण पूर्र्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळतेच असे नाही. कोरोना परिस्थितीत तर अनेकांचे हाल झाले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील वारसांना आता नोकरी मिळणारआहे. 

टॅग्स :jobनोकरीRaigadरायगड