शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम तुंगी गावात लवकरच पोहोचणार वीज

By admin | Updated: December 22, 2016 06:18 IST

तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावात काही दिवसांनी वीज पोहचणार आहे. खासदार श्रीरंग बारणे

विजय मांडे / कर्जततालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावात काही दिवसांनी वीज पोहचणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीमध्ये वन विभागाकडे केलेला पाठपुरावा आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तुंगी गावाला वीज पोहोचावी म्हणून आमदार सुरेश लाड आणि जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तीन किलोमीटर लांबीवरून तुंगी गावात सौदामिनी पोहोचावी या प्रस्तावास महावितरण कंपनीने अंतिम मंजुरी दिली आहे. तुंगी गावातील लोकांचा सौर दिव्याच्या प्रकाशात रात्र काढण्याचा दररोजचा प्रसंग आता कालबाह्य होणार आहे.तुंगी हे दुर्गम भागात वसलेले गाव वीज, रस्ता या पायाभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावाच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या खांडस गावात पाझर तलाव आणि तर पाठीमागे असलेल्या डोंगरपाडा गावात देखील पाझरतलाव आजही काठोकाठ भरलेला आहे. असे असतानाही टेकडीवर असलेल्या तुंगीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असते. ८० घरांची वस्ती असलेल्या या गावात जाण्यासाठी रस्ता वन विभाग आपल्या जमिनीतून करू देत नाही, त्यामुळे विजेचे खांब देखील टाकता येत नाहीत.त्यामुळे या तुंगी गावात वर्षानुवर्षे अंधाराचे साम्राज कायम असते. त्यावर काही प्रमाणात मात करण्याचा प्रयत्न तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांनी प्रथम तुंगी गावासाठी आपल्या निधीतून सौर दिवे दिले. त्यावेळी गावाच्या वेशी उजळण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने करून बघितला होता. त्यानंतर आदिवासी प्रकल्प विभागाने त्या गावातील घरात दिव्यांचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला. गावातील ८० घरातील प्रत्येक घरी एक असे ८० सौर दिवे दिले. २००५ मध्ये या गावाची दैना पावसाळ्यात दरडी कोसळून आणि आजूबाजूला असलेल्या डोंगरात भूस्खनन होऊन झाली. गाव विस्थापित करण्याची वेळ आहे. शेतजमीन त्या भागात असल्याने स्थानिकांनी त्याच भागात विस्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र रखडलेले काम आजही त्याच स्थितीत असून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी समाज कल्याण विभागातून प्रत्येकी १५ हजार खर्च असलेले ४० सौर दिवे असलेले किट मंजूर करून घेतले. या सौर दिव्यांच्या किट आज तुंगीमधील प्रत्येक घरावर दिसून येतात. त्यामुळे सौर दिव्याच्या प्रकाशात आयुष्य काढावे लागेल अशी परिस्थिती असताना या भागाचे खासदार श्रीरंग बारणे कर्जत दौऱ्यावर आले असता त्यांनी खांडस भागात तुंगी ग्रामस्थांची भेट घेतली. वन विभागाकडे आपण पाठपुरावा करून रस्ता आणि विजेचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. पुढे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत खासदार बारणे, आमदार लाड,जिल्हा परिषद सदस्य पेमारे यांनी तुंगी गावाचा प्रश्न सतत लावून धरला होता. सततच्या पाठपुराव्याला यश आले असून महावितरण कंपनीने तुंगी गावातील विजेच्या प्रस्ताव वन विभागाकडे जमीन मिळण्यासाठी केला. वन विभागाने आपल्या जमिनीतून डोंगरपाडा ते तुंगी अशा मार्गात विजेचे खांब बसविण्यास मंजुरी दिल्यानंतर दीनदयाळ उपाध्याय जीवन ज्योती योजनेमधून वीज पुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.