शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 02:25 IST

सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि गादीचे वारस असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक तालुक्यातील गांगवली या जन्मगावामध्ये उभारले जावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. माणगावपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गांगवली गावामध्ये महाराणी येसूबाईंच्या पोटी १८ मे, १६८२ या दिवशी थोरल्या शाहू महाराजांचा जन्म झाला, असा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे.गांगवली गावच्या हद्दीत तोंडलेकरवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी, मोकाशीवाडी, खरबाचीवाडी अशा पूर्वापार वाडत्ता आहेत. कुंभारवाडीतून साळवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुप्रसिद्ध वैजनाथ महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणाºया वैपूर्णा नदीवर नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधलेला फरसबंद नदीघाट आहे, तर पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतात. मंदिराच्या समोरच चिरेबंदी वाड्याच्या खाणाखुणा आजही दिसतात.छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाऱ्यांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो. परंतु अशा या ऐतिहासिक भूमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे, अशी मागणी गांगवली येथील ग्रामस्थांकडून होत आहे. पुरातत्त्व खात्याने याकडे लक्ष देऊन संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आाहे. अनेक नागरिकांना या प्राचीन वास्तूबाबत माहिती नसल्याने येथे माहिती फलक लावावे. या वास्तूचे संवर्धन झाल्यास येथे पयटक नक्कीच भेट देतील.माणगावपासून राजधानी रायगडकडे जाणा-या मुख्य मार्गालगत असलेल्या या ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख असलेला साधा माहितीफलक दिसत नाही.माणगाव तालुक्यात जन्म घेतलेल्या थोरल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळ परिसरात पूर्णाकृ ती मूर्ती स्मारक बनवावे, तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतातछत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाºयांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो.माणगावच्या पावनभूमीत अनेक शूरवीरांचा जन्म1शिवकालीन चिरेबंदी वाड्यावरच सन १९८० मध्ये रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अक्षरश: ओसाड अवस्थेत आहे.2माणगावच्या पावनभूमीत सरसेनापती प्रतापराव गुजर, पायदळप्रमुख येसाजी कंक, सरखेल कान्होजी आंग्रेंचे विश्वासू सरदार खंडोजी माणकर यांसारख्या शूरवीरांचा जन्म झाला आहे.3याचबरोबर अठराव्या शतकातील आशिया खंडातील सर्वात ताकदवान अजातशत्रू सम्राट असं परकीय इतिहासकारांनी गौरविलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान मात्र उपेक्षितच राहिले आहे. कुशल प्रशासक, धोरणी राजा आणि स्वराज्याचे चौथे छत्रपती अशी ओळख असलेल्या महापुरुषांच्या जन्मगावात विदारक चित्र पाहायला मिळते .

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास