शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 02:25 IST

सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि गादीचे वारस असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक तालुक्यातील गांगवली या जन्मगावामध्ये उभारले जावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. माणगावपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गांगवली गावामध्ये महाराणी येसूबाईंच्या पोटी १८ मे, १६८२ या दिवशी थोरल्या शाहू महाराजांचा जन्म झाला, असा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे.गांगवली गावच्या हद्दीत तोंडलेकरवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी, मोकाशीवाडी, खरबाचीवाडी अशा पूर्वापार वाडत्ता आहेत. कुंभारवाडीतून साळवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुप्रसिद्ध वैजनाथ महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणाºया वैपूर्णा नदीवर नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधलेला फरसबंद नदीघाट आहे, तर पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतात. मंदिराच्या समोरच चिरेबंदी वाड्याच्या खाणाखुणा आजही दिसतात.छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाऱ्यांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो. परंतु अशा या ऐतिहासिक भूमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे, अशी मागणी गांगवली येथील ग्रामस्थांकडून होत आहे. पुरातत्त्व खात्याने याकडे लक्ष देऊन संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आाहे. अनेक नागरिकांना या प्राचीन वास्तूबाबत माहिती नसल्याने येथे माहिती फलक लावावे. या वास्तूचे संवर्धन झाल्यास येथे पयटक नक्कीच भेट देतील.माणगावपासून राजधानी रायगडकडे जाणा-या मुख्य मार्गालगत असलेल्या या ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख असलेला साधा माहितीफलक दिसत नाही.माणगाव तालुक्यात जन्म घेतलेल्या थोरल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळ परिसरात पूर्णाकृ ती मूर्ती स्मारक बनवावे, तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतातछत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाºयांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो.माणगावच्या पावनभूमीत अनेक शूरवीरांचा जन्म1शिवकालीन चिरेबंदी वाड्यावरच सन १९८० मध्ये रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अक्षरश: ओसाड अवस्थेत आहे.2माणगावच्या पावनभूमीत सरसेनापती प्रतापराव गुजर, पायदळप्रमुख येसाजी कंक, सरखेल कान्होजी आंग्रेंचे विश्वासू सरदार खंडोजी माणकर यांसारख्या शूरवीरांचा जन्म झाला आहे.3याचबरोबर अठराव्या शतकातील आशिया खंडातील सर्वात ताकदवान अजातशत्रू सम्राट असं परकीय इतिहासकारांनी गौरविलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान मात्र उपेक्षितच राहिले आहे. कुशल प्रशासक, धोरणी राजा आणि स्वराज्याचे चौथे छत्रपती अशी ओळख असलेल्या महापुरुषांच्या जन्मगावात विदारक चित्र पाहायला मिळते .

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास