शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

रायगडच्या समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य वाढवताेय देखणा समुद्र गरुड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 13:53 IST

अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 - जयंत धुळप

अलिबाग -  गृध्राद्य पक्षीकुळातील एक शिकारी पक्षी समुद्र गरुड हा अत्यंत देखणा पक्षी इंग्रजी मध्ये त्यास Whitebellid sea eagle म्हणून तर  हिंदी मध्ये कोहासा, समुद्री उकाब, संपमार अशा नावाने आेळखले जाते. मात्र अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने या किनारपट्टीतील समुद्र गरुड वास्तव्याकरिता आवश्यक निसर्ग आणि पर्यावरण चांगले आहे,यावर अनाहूतपणे शिक्का माेर्तब हाेत आहे.समुद्र किनारी आढळतात समुद्र गरुड दाम्पत्ये

समुद्र गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो .डोके ,मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो .तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो .उडताना पांढऱ्या पंखांखालची काळया किनारीमूळे या पक्ष्याची ओळख पटते .हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी V या अक्षरासारखा दिसतो .यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात .हे समुद्र –किनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीत अस्तित्व

मुंबई पासून दक्षिणेस पश्चिम किनारा आणि पूर्व किनाऱ्र्यावरील बांगला देशात समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर हे समुद्र गरुड आढळतात .श्रीलंका ,लक्षद्विप, अंदमान आणि निकोबार बेटे ,तसेच गुजरात मध्ये ते दिसतात .दक्षिण भारतात नोव्हेंबर -मार्च तर उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिल या काळात समुद्र गरुड आढळतात.

दहा वर्ष जूनी घरटी, एकाच घरट्यात अनेक वर्ष राहाण्याची मानसिकता

मासे हेच प्रमुख खाद्य असणारे हे सागरी गरुड समुद्र किनारी असलेल्या उंच सुरुं, पिपळ,वड आदि झाडांवर घरटी करुन राहातात. रेवदंडा ते मुरुड या सागरी किनारपट्टीत एकूण आठ सागरी गरुड दाम्पत्यांची घरटी असून ती किमान १० वर्षांपासून असल्याचे निरिक्षण पक्षी अभ्यासक आणि फाॅरेस्ट राऊंड आॅफीसर हरिश्चंद्र नाईक यांनी लाेकमत शी बाेलताना सांगीतले. समुद्र गरुड दाम्पत्याचा स्वभाव एकाच घरट्यांत अनेक वर्ष वास्तव्य करण्याचा असताे. अलिबाग येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या जागेत समुद्र किनारी अशाच प्रकारचे समुद्र गरुड दाम्पत्याचे असलेले घरटे किमान २० वर्षांपासून आहे.

वातावरणाचे पूर्वसंकेत देणारे सागरी गरुड

सागरातील बदल, वातावरणातील बदल, पावसाचे संकेत या सागरी गरुडांच्या वावरण्यावरुन बांधले जातात. काेळीबांधवांना वातावरणाचे पूर्वसंकेत देण्यात समुद्र गरुड माेठी महत्वाची भूमीका बजावीत असतात. समुद्र गरुडांची अस्तीत्वात असलेली घरटी सरक्षीत करण्याकरीता प्रयत्न झाले पाहीजेत अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड