शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य वाढवताेय देखणा समुद्र गरुड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 13:53 IST

अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 - जयंत धुळप

अलिबाग -  गृध्राद्य पक्षीकुळातील एक शिकारी पक्षी समुद्र गरुड हा अत्यंत देखणा पक्षी इंग्रजी मध्ये त्यास Whitebellid sea eagle म्हणून तर  हिंदी मध्ये कोहासा, समुद्री उकाब, संपमार अशा नावाने आेळखले जाते. मात्र अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने या किनारपट्टीतील समुद्र गरुड वास्तव्याकरिता आवश्यक निसर्ग आणि पर्यावरण चांगले आहे,यावर अनाहूतपणे शिक्का माेर्तब हाेत आहे.समुद्र किनारी आढळतात समुद्र गरुड दाम्पत्ये

समुद्र गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो .डोके ,मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो .तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो .उडताना पांढऱ्या पंखांखालची काळया किनारीमूळे या पक्ष्याची ओळख पटते .हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी V या अक्षरासारखा दिसतो .यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात .हे समुद्र –किनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीत अस्तित्व

मुंबई पासून दक्षिणेस पश्चिम किनारा आणि पूर्व किनाऱ्र्यावरील बांगला देशात समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर हे समुद्र गरुड आढळतात .श्रीलंका ,लक्षद्विप, अंदमान आणि निकोबार बेटे ,तसेच गुजरात मध्ये ते दिसतात .दक्षिण भारतात नोव्हेंबर -मार्च तर उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिल या काळात समुद्र गरुड आढळतात.

दहा वर्ष जूनी घरटी, एकाच घरट्यात अनेक वर्ष राहाण्याची मानसिकता

मासे हेच प्रमुख खाद्य असणारे हे सागरी गरुड समुद्र किनारी असलेल्या उंच सुरुं, पिपळ,वड आदि झाडांवर घरटी करुन राहातात. रेवदंडा ते मुरुड या सागरी किनारपट्टीत एकूण आठ सागरी गरुड दाम्पत्यांची घरटी असून ती किमान १० वर्षांपासून असल्याचे निरिक्षण पक्षी अभ्यासक आणि फाॅरेस्ट राऊंड आॅफीसर हरिश्चंद्र नाईक यांनी लाेकमत शी बाेलताना सांगीतले. समुद्र गरुड दाम्पत्याचा स्वभाव एकाच घरट्यांत अनेक वर्ष वास्तव्य करण्याचा असताे. अलिबाग येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या जागेत समुद्र किनारी अशाच प्रकारचे समुद्र गरुड दाम्पत्याचे असलेले घरटे किमान २० वर्षांपासून आहे.

वातावरणाचे पूर्वसंकेत देणारे सागरी गरुड

सागरातील बदल, वातावरणातील बदल, पावसाचे संकेत या सागरी गरुडांच्या वावरण्यावरुन बांधले जातात. काेळीबांधवांना वातावरणाचे पूर्वसंकेत देण्यात समुद्र गरुड माेठी महत्वाची भूमीका बजावीत असतात. समुद्र गरुडांची अस्तीत्वात असलेली घरटी सरक्षीत करण्याकरीता प्रयत्न झाले पाहीजेत अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड