शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रायगड जिल्ह्यात ७९८ अपघातांत २३३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:47 IST

८६५ जण जखमी; ४२ अपघातप्रवण ठिकाणे; रस्ता सुरक्षा समितीची बैठक

अलिबाग : राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हा मार्गावर जिल्ह्यात विविध मार्गांवर ४२ ठिकाणे अपघातप्रवण म्हणून नोंदविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ मध्ये ७९८ अपघात झाले असून त्यात २३३ व्यक्तींचे बळी गेले आहेत, तर ८६५ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याच कालावधीत २०१७ मध्ये ७५४ अपघात झाले होते. त्यात १८१ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ६९८ जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर परिवहन व पोलीस विभागाने भर द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिले.बैठकीस अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पेण येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उप अभियंता व्ही. आर. बागुल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता रूपेश सिंगासने, जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता मृदुला दांडेकर आदी उपस्थित होते.अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर करण्यात हलगर्जी, जादा क्षमतेने प्रवासी व मालवाहतूक, बेदरकारपणे वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावणे, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा पालन न करणे आदी कारणांमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असतात. त्यासाठी वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर द्यावा, असे निर्देश सूर्यवंशी यांनी दिले. तसेच नोंदविण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणे, रम्बलिंग स्ट्रीप्स बसवणे, सूचना फलक उभारणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपी चालकांची कसून तपासणीयेत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविल्याबाबतची कसून तपासणी करावी. वेगमर्यादेचे काटेकोर पालन व वाहतूक सुरक्षा उपाययोजनांचे पालन काटेकोर व्हावे, असे निर्देश देण्यात आले.तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये. त्यासाठी आता पालकांवर कारवाई होत असते, हे ध्यानात घ्यावे.अतिवेगाने वाहन चालविल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होतो. तर मद्यपान करून वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित होतो. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयातून समुपदेशन व उपचार घेणे आवश्यक असते, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड