शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रायगड जिल्ह्यात ७९८ अपघातांत २३३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:47 IST

८६५ जण जखमी; ४२ अपघातप्रवण ठिकाणे; रस्ता सुरक्षा समितीची बैठक

अलिबाग : राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हा मार्गावर जिल्ह्यात विविध मार्गांवर ४२ ठिकाणे अपघातप्रवण म्हणून नोंदविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ मध्ये ७९८ अपघात झाले असून त्यात २३३ व्यक्तींचे बळी गेले आहेत, तर ८६५ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याच कालावधीत २०१७ मध्ये ७५४ अपघात झाले होते. त्यात १८१ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ६९८ जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर परिवहन व पोलीस विभागाने भर द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिले.बैठकीस अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पेण येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उप अभियंता व्ही. आर. बागुल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता रूपेश सिंगासने, जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता मृदुला दांडेकर आदी उपस्थित होते.अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर करण्यात हलगर्जी, जादा क्षमतेने प्रवासी व मालवाहतूक, बेदरकारपणे वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावणे, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा पालन न करणे आदी कारणांमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असतात. त्यासाठी वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर द्यावा, असे निर्देश सूर्यवंशी यांनी दिले. तसेच नोंदविण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणे, रम्बलिंग स्ट्रीप्स बसवणे, सूचना फलक उभारणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपी चालकांची कसून तपासणीयेत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविल्याबाबतची कसून तपासणी करावी. वेगमर्यादेचे काटेकोर पालन व वाहतूक सुरक्षा उपाययोजनांचे पालन काटेकोर व्हावे, असे निर्देश देण्यात आले.तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये. त्यासाठी आता पालकांवर कारवाई होत असते, हे ध्यानात घ्यावे.अतिवेगाने वाहन चालविल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होतो. तर मद्यपान करून वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित होतो. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयातून समुपदेशन व उपचार घेणे आवश्यक असते, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड