शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

रायगड जिल्ह्यात ७९८ अपघातांत २३३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:47 IST

८६५ जण जखमी; ४२ अपघातप्रवण ठिकाणे; रस्ता सुरक्षा समितीची बैठक

अलिबाग : राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हा मार्गावर जिल्ह्यात विविध मार्गांवर ४२ ठिकाणे अपघातप्रवण म्हणून नोंदविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ मध्ये ७९८ अपघात झाले असून त्यात २३३ व्यक्तींचे बळी गेले आहेत, तर ८६५ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याच कालावधीत २०१७ मध्ये ७५४ अपघात झाले होते. त्यात १८१ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ६९८ जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर परिवहन व पोलीस विभागाने भर द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिले.बैठकीस अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पेण येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उप अभियंता व्ही. आर. बागुल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता रूपेश सिंगासने, जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता मृदुला दांडेकर आदी उपस्थित होते.अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर करण्यात हलगर्जी, जादा क्षमतेने प्रवासी व मालवाहतूक, बेदरकारपणे वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावणे, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा पालन न करणे आदी कारणांमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असतात. त्यासाठी वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर द्यावा, असे निर्देश सूर्यवंशी यांनी दिले. तसेच नोंदविण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणे, रम्बलिंग स्ट्रीप्स बसवणे, सूचना फलक उभारणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपी चालकांची कसून तपासणीयेत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविल्याबाबतची कसून तपासणी करावी. वेगमर्यादेचे काटेकोर पालन व वाहतूक सुरक्षा उपाययोजनांचे पालन काटेकोर व्हावे, असे निर्देश देण्यात आले.तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये. त्यासाठी आता पालकांवर कारवाई होत असते, हे ध्यानात घ्यावे.अतिवेगाने वाहन चालविल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होतो. तर मद्यपान करून वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित होतो. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयातून समुपदेशन व उपचार घेणे आवश्यक असते, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड