शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Purushottam Karandak: एकांकिकेसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय महत्वाचे; मात्र पुण्यातील तरुणाईचा तांत्रिक गोष्टींवरच भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 10:46 IST

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पूर्वीसारख्या एकांकिका आता येत नसल्याची आयोजकांची खंत

श्रीकिशन काळे

पुणे : पुरुषोत्तम करंडकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये लगबग सुरू होत आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र कलोपासक संस्थेच्या आयोजकांनी मात्र एकांकिकांच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पूर्वीसारख्या एकांकिका आता येत नाहीत. विद्यार्थी अभ्यास करून तालमी करीत नाहीत. त्यामुळे त्या गुणवत्तेच्या एकांकिका येत नसल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये एकांकिकेचा आशय, विषय, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या बाबींवर सर्वोच्च महत्त्व दिले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील तरुणाई यावर अधिक भर न देता तांत्रिक गोष्टींवर देत आहे. त्यामुळे चांगल्या, दमदार एकांकिका सादर होत नाहीत आणि परिणामी पुण्याबाहेरील एकांकिकांना पारितोषिके मिळत आहेत. करंडकही काही वर्षांपासून बाहेरील मुले पटकावत आहेत. शहरातील मुले पुरेसे कष्ट करत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याची चिंता आयोजकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थी लेखक आता घडत नाहीत, हीदेखील खंत त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र कलोपासक संस्थेच्या प्रारंभापासून राजाभाऊ नातू, मधु जोशी, प्रमिलाताई बेडेकर आणि त्यांच्यानंतरही संस्थेच्या सदस्यांनी स्पर्धेचे नेटके आयोजन आणि काटेकोर नियोजन केले आहे. या स्पर्धेतून मराठी नाट्य - चित्रपटसृष्टीला लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते मिळाले आहेत. अनेक कलाकारांची कारकीर्द पुरुषोत्तमच्या रंगमंचापासून सुरू झाली आहे.

संस्थेची स्थापना कशी झाली ?

- महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची स्थापना पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी केली. या शाळेतील शिक्षक संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फरसबंद पारावर बसून, नुकत्याच पाहिलेल्या नाटकांवर टीका-टिप्पणी करीत बसायचे. पुण्यातील सार्वकालिक विद्वान गृहस्थ आणि इतिहासकार महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा पाराजवळून जाता जाता शिक्षकांच्या गप्पा ऐकल्या.- दत्तो वामन पोतदार म्हणाले, ‘दुसऱ्यांच्या नाटकांवर एवढी टीका करण्यापेक्षा तुम्हीच एखादे निर्दोष नाटक बसवून आणि करून का दाखवत नाही?’ त्या शिक्षकांनी ही सूचना खरोखरच मनावर घेतली आणि ३ ऑगस्ट १९३६ रोजी महाराष्ट्रीय कलोपासक ही हौशी आणि प्रायोगिक नाट्य संस्था सुरू केली. दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.- सुरुवातीच्या काळात संस्थेने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धा सुरू केली. शिवाय, काही नव्या - जुन्या नाटकांचे प्रयोग रंगमंचावर सादर करण्यास आरंभ केला. पुढे महाराष्ट्र सरकारने आंतरशालेय नाट्य स्पर्धा चालू केल्यानंतर ‘महाराष्ट्रीय कलोपासक‘ने ही नाट्यवाचन स्पर्धा बंद केली.- महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे (पु. रा. वझे) यांचे एक ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ १९६३पासून संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Puneपुणेartकलाcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणSocialसामाजिक