शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

"आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवणार, ८४ वर्षांचा असलो तरी अजून म्हातारा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 10:48 IST

आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवणार असून, राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे...

आळंदी (पुणे) : मी ८४ वर्षांचा झालो असलो तरी मी अजून म्हातारा झालो नाही. कारण तुम्ही माझे काय पाहिलं. माझ्या वयाची चिंता कोणी करू नये. त्यामुळे सर्वांनी माझ्या वयावर बोलणं टाळावं. आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवणार असून, राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे मी सेवेकरी सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीला रविवारी (दि.१७) शरद पवारांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, पै. मंगलदास बांदल, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुधीर मुंगसे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. विशाल झरेकर, माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, बबनराव कुऱ्हाडे आदींसह बैलगाडा चालक - मालक शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, बैलगाडा शर्यती घाटात उपस्थित राहून पाहण्याचा पहिल्यांदाच योग आला. मात्र, येथील मुंगसे बंधूंनी भरविलेल्या बैलगाडा शर्यती पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. शेतकऱ्यांचा हा छंद पिढ्यानपिढ्या जोपासणे गरजेचे आहे. माजी आमदार विलास लांडे म्हणाले, चाकण, रांजणगाव, सणसवाडीत पवार साहेबांनी एमआयडीसी आणली. जिल्ह्यात आयटी पार्क उभारले. जिल्हा विकसित करण्यामागे पवार साहेबांचे मोठे योगदान आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, मी शेतकऱ्यांचा बंद झालेला बैलगाड्यांचा हट्ट पूर्ण केला. संसदेत बैलगाडा विषयावर बोलताना विरोधकांकडून थट्टा व्हायची. मात्र, नेते शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे बैलगाडा शर्यती सुरू करण्यात यश मिळाले. एकीकडे कांदा प्रश्न आहे, दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, सरकार फक्त बारी बसवण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळात त्यांची बारी बसणार नाही. युवानेते सुधीर मुंगसे म्हणाले, बैलगाडा सुरू करण्यामागे शरद पवारांचे योगदान आहे. दुष्काळी परिस्थितीत शरद पवारांनी तालुक्यात तीन धरणे बांधली. त्यामुळे तालुक्यातील जमीन सुजलाम सुफलाम झाली. तालुक्यातील जनतेचे खरोखरच आपल्यावर प्रेम आहे. त्यामुळे येत्या काळात ही जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.

पुणे जिल्ह्यात धरणे बांधली. उद्योगधंदे वाढवले. त्यामुळे शेती संपन्न झाली. जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकतोय. मात्र, सद्य:स्थितीत सरकारने कांदा निर्यात बंदी केली. शेतकरी अडचणीत असतानाही सत्ताधारी शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. आगामी काळात नव्याने एकजूट करून ही सत्ता उलटवणे गरजेचे आहे.

- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार