शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 10:30 PM

सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले.

पुणे : सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आज देखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला पर्याय उपलब्ध करू देऊ, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन व पश्चिम  महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे आयोजित केली होता.  यावेळी पवार बोलत होते. सभेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, चित्रा वाघ,  हसन मुश्रिफ , दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, आण्णा डांगे, जयदेव गायकवाड, वंदना चव्हाण, जालिंदर कामठे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ देशात शेतकरी, व्यापारी, कामगार, सरकारी कर्मचारी कोणीच सुखी नाही. भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्याचा तर विक्रम झाला. नोटाबंदीचा निर्णय किती फसवा असल्याचे नेपाळमध्ये  आजही भारतीय जुन्या नोटा बदलून मिळातात यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सत्तेवर येताना दिलेली सर्व आश्वासने फसवी असल्याचे आता जनतेच्या लक्षात आले आहे. छगन भुजबळ असो की देशाचे माजी अर्थंमंत्री पी. चिदंबरम यांना आत टाकण्याचे राजकारण भाजप करत आहे.  पुणे शहरातील एल्गार परिषदेच्या लोकांना नक्षलवादी ठरवणे असो की कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे. भाजप सरकारला लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही.  त्यामुळेच देशातील सर्वच राज्यातील विरोधी पक्षाचे लोक भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची मानसिकता तयार झाली असून, हीच मानसिकता भाजपचा पराभव करू शकते. ’’

देशातील जनतेचा ईव्हीएम मशिनवर विश्वास राहिला नाही. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर मशिनबाबत तक्रार केली जाते असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. परंतु भंडारा-गोंदिया निवडणुकीत आमचा विजय होऊन देखील येथे मतदान यंत्रातील झालेल्या गोंधळाबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यापुढे ईव्हीएम मशिन नकोच अशी भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. देशात, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत परिर्वतन करण्याची गरज असून, यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा देखील पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले,  ‘‘आता पर्यंत गाव तेथे राष्ट्रवादी ही संकल्पना होती. पण आपल्या समोरील आवाहन मोठे आहे , त्यामुळे या पुढे ‘बुथ तेथे राष्ट्रवादी’ काम करण्याची गरज आहे. बुथ कमिटीच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहजण्याचे नियोजन केले.’ अजित पवार म्हणाले, ‘‘कोणीही सत्तेच्या गुर्मीत राहू नये, आज सत्तेत असलो तरी उद्या विरोधात बसू शकतात़  समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर झालाय. शेतकरी संपावर, शिक्षक संपावर, एसटी कामगार संपावर, सरकारी कर्मचारी संपावर, राज्यातील राज्यकर्ते करताय तरी का असा सवाल उपस्थित केला. यावेळी प्रफुल पटेल, सुनिल तटकरे,जयदेव गायकवाड, फौजीया खान आदी भाषण केले. आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत वंदना चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेBhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018