शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

Navale Bridge Accident: काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं! नातेवाईकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:59 IST

नियतीने एकत्र गाठलेल्या या तिघांनाही अखेरच्या प्रवासातही एकत्रच निरोप मिळाला

धायरी: शहराला हादरवून सोडणाऱ्या नवले पूल भीषण अपघातातील तीन दुर्दैवी मृतांवर शुक्रवारी (दि. १४) नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वडगाव खुर्द येथील स्वाती संतोष नवलकर (वय ३७, रा. विश्वास पॅलेस, धायरी फाटा), शांता दत्तात्रय दाभाडे (वय ५४) आणि त्यांचे पती दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (वय ५८, दोघे रा. सत्यसाई अपार्टमेंट, धायरी फाटा) या तिघांच्या पार्थिवावर सकाळी साडेअकरा वाजता अंत्यविधी पार पडला.

एकाच दुर्घटनेत निष्पाप जीव गेल्याने धायरी फाटा परिसरावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी वैकुंठमध्ये हे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले. एकाच कुटुंबातील आणि जवळच्या परिसरातील तिघांचे मृतदेह जेव्हा वेगवेगळ्या विद्युत वाहिन्यांवर एकाच वेळी ठेवण्यात आले, तेव्हा उपस्थित नातेवाइकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

‘‘काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं!’’ असा आर्त टाहो फोडत नातेवाईक आक्रोश करत होते. नियतीने एकत्र गाठलेल्या या तिघांनाही अखेरच्या प्रवासातही एकत्रच निरोप मिळाला. अपघाताच्या धक्क्यातून सावरत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांत पाणी दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हृदयद्रावक घटनेने दिलेले दुःख स्पष्टपणे जाणवत होते. हा अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा क्षण होता, ज्याने उपस्थित प्रत्येकालाच स्तब्ध केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Navale Bridge Accident: Three Lives Lost, Families Grieve Together.

Web Summary : The Navale Bridge accident claimed three lives. On Friday, the deceased were cremated. Grieving relatives mourned the sudden loss. The tragic scene left everyone present heartbroken and stunned by the shared tragedy.
टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलFamilyपरिवारAccidentअपघातhighwayमहामार्ग